काही दिवसांतच गतिरोधक खराब : अशास्त्राrय पद्धतीने असलेले गतिरोधक हटविण्याची मागणी : वाहनचालकांच्या तक्रारी वाढल्या
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटीचे काम शहरात सुरू झाले. त्यानंतर अनेक रस्त्यांवर भरधाव वाहने चालविली जात आहेत. त्यामुळे शहरातील अनेक रस्त्यांवर गतिरोधक लावण्यात आले. मात्र काही दिवसांतच गतिरोधक खराब झाले आहेत. त्यामुळे वाहनचालकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्मार्ट सिटीचे रस्ते स्मार्ट होत असले तरी गतिरोधक मात्र स्मार्ट नसल्याच्या प्रतिक्रिया आता उमटू लागल्या आहेत. याचबरोबर यापूर्वी असलेल्या जुन्या रस्त्यांवर अशास्त्राrय पद्धतीने गतिरोधक बसविण्यात आले आहेत. त्याचाही फटका वाहनचालकांना बसत आहे. त्याबद्दलही वाहनचालकांच्या तक्रारी वाढल्या आहेत.
शहरातील वाहतूक व्यवस्था व वाहनांना शिस्त लावण्यासाठी रहदारी पोलिसांची भूमिका मोलाची असते. मात्र मागील दोन ते तीन वर्षांतील अपघातांची संख्या पाहता यासाठी काय करता येईल, याची काळजी घेणे गरजेचे वाटते. शहराचा पसारा वाढतो आहे, तशी अपघातांच्या संख्येतही वाढ होत आहे. धूमस्टाईलला अडसर म्हणून गतिरोधकांची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र सर्वच गतिरोधकांची अवस्था सध्या दयनीय झाली आहे. याकडे लक्ष कोण देणार, असाच प्रश्न उपस्थित होत आहे. दरम्यान, गतिरोधकांची झालेली अवस्था सुधारावी, अशी मागणीही होत आहे.
शहरात अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. वाहतुकीसंदर्भातील काळजी रहदारी पोलीस व महापालिका घेत नसल्यानेच अपघात होण्याच्या संख्येत वाढ झाली आहे. या अपघातांना सर्वस्वी महापालिका, सार्वजनिक बांधकाम खाते तसेच रहदारी पोलीसही तितकेच जबाबदार दिसून येत आहेत. न्यायालयासमोरील मुख्य रस्त्यावर गतिरोधक बसविल्यानंतर काही दिवसांतच खराब झाला आहे. त्यामुळे वकीलवर्गांतून तसेच वाहनचालकांतून नाराजी व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात असलेल्या लोकायुक्त कार्यालयाच्या बाजूलाही एका गतिरोधकामधून लोखंडी रॉड बाहेर पडले आहेत. त्यामुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्मयता व्यक्त होत आहे.
शहरात विविध ठिकाणी अशास्त्राrय पद्धतीचे गतिरोधक तयार करण्यात आल्याने अपघात घडू लागले आहेत. काही ठिकाणी गतिरोधक आवश्यक असताना त्याठिकाणी गतिरोधक घालण्यात आला नाही. तर नको त्या ठिकाणी सरकारी पैसा वाया घालण्यातच धन्यता मानली जात आहे. दरम्यान, ज्या ठिकाणी अपघात घडू लागले आहेत त्याठिकाणी काळजी घेणे गरजेचे असते. मात्र याकडे पाठ फिरवून आपली जबाबदारी संपली म्हणून हात झटकण्यात येत आहेत.
गोवावेस तसेच डाक बंगला याठिकाणी गतिरोधक बसविण्याची गरज निर्माण झाली आहे. कारण दोन्ही सर्कलमध्ये भरधाव वाहने येत आहेत. त्यासाठी योग्यप्रकारे गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे. त्यामुळे वाहनांचा वेग कमी होईल व अपघात टळतील, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसविण्याची गरज
शहरात काही ठिकाणी गतिरोधक उंच असल्याने त्याठिकाणी वाहनचालक घसरून पडू लागले आहेत. या गतिरोधकांवरून जात असताना वाहनचालकांना व मागे बसलेल्यांना त्रास जाणवू लागला आहे. वाहनांचेही नुकसान होऊ लागले आहे. बऱयाचवेळा दुचाकीवरून जाताना नियंत्रण सुटून गतिरोधकावरून पडून अनेकजण जखमी होऊ लागले आहेत. तेव्हा हे गतिरोधक शास्त्राrय पद्धतीने बसवावेत, अशी मागणी जनतेतून होत आहे. गोवावेसजवळील अग्निशमन दल कार्यालयासमोर गतिरोधक बसविण्यात आले आहेत. मात्र त्या गतिरोधकाची उंची तसेच रुंदी अधिक असल्याने रात्रीच्यावेळी वाहनचालकांना समस्या निर्माण होत आहेत.