प्रतिनिधी /पणजी
सीबीआयचा जागृती आठवडा देशभर चालू असून स्वयंपूर्ण भारत बनविण्यास आणि भ्रष्टाचार नष्ट करण्यासाठी सामान्य जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन सीबीआयचे अधीक्षक आशेष कुमार यांनी केले. यावेळी इतर अधिकारी नागेश परब, अपर्णा चोपडेकर, संदीप हंडेकर, संजीवन नाईक उपस्थित होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वयंपूर्ण भारताचे स्वप्न पूर्ण व्हायचे असेल तर भ्रष्टाचार मोडून काढला पाहिजे. सीबीआय फक्त केंद्रीय अधिकाऱयावर छापा टाकू शकते. राज्यातील अधिकारी सीबीआयच्या अखत्यारित येत नाहीत, असे त्यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या तक्रारी कशा कराव्यात. सीबीआयला टिप्स आणि माहिती कशी पुरवावी यावर जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.