खानापूर तालुक्यात 40 वर्षात पहिल्यांदाच जीर्ण विद्युतखांब – विद्युत वाहिन्या बदलण्याची मोहीम : उर्वरित गावातील कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण करणार
वार्ताहर / खानापूर
देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर खानापूर तालुक्मयाच्या ग्रामीण भागात पहिल्यांदाच 40 वर्षांपूर्वी विद्युतपुरवठा गावागावात पोहोचला होता. प्रारंभीच्या काळात खानापूरसारख्या मोजक्मयाच गावात विद्युतपुरवठा करण्यात आला. पण तालुक्मयातील अनेक गावे विद्युतपुरवठय़ाअभावी कंदीलाच्या आधारावर अनेक वर्षे उपजीविका करत होती. पण अखेर 40 वर्षांपूर्वी म्हणजे 1974-75 च्या काळात तालुक्मयाच्या ग्रामीण भागामध्ये पहिल्यांदाच वीज पोहोचली होती आणि खऱया अर्थाने सर्वसामान्य नागरिकांना ग्रामीण भागातील वीजपुरवठय़ामुळे अंधारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्याची दिशा मिळाली होती.
तालुक्मयात त्या टप्प्यात जवळपास 219 एकोणीस खेडय़ांमध्ये सदर वीजपुरवठा करण्यात आला होता. त्यानंतर गावांचा विस्तार होत गेला तशा वीजवाहिन्या विस्तारित गेल्या. पण जीर्ण विद्युतवाहिन्या व खांब बदलण्यासाठी गेल्या 40 वर्षात शासनाने कोणतीच विशेष योजना हाती घेतली नव्हती. पण अलीकडे हुबळी ग्रामीण विद्युतपुरवठा निगमच्या माध्यमातून खानापूर तालुक्मयातील तब्बल 163 खेडय़ांमध्ये गेल्या काही महिन्यात विद्युतवाहिन्या बदलण्याचे काम व जीर्ण झालेले खांब हटवण्याची मोहीम हेस्कॉमने हाती घेतली आहे. यासाठी हेस्कॉमचे बेळगाव जिल्हा ग्रामीण वीजपुरवठा अभियंते प्रवीण कुमार चिकाडे यांचे विशेष प्रयत्न याकामी मोलाचे ठरले आहेत. त्यांच्या या प्रयत्नातून खानापूर तालुक्मयात 219 गावांपैकी आतापर्यंत 163 गावात सदर योजना अमलात आली आहे. तर उर्वरित 83 गावांचा टप्प्याटप्प्याने विकास साधला जाणार आहे. या विशेष योजनेअंतर्गत तालुक्मयातील प्रत्येक गावात जीर्ण विद्युतवाहिन्या व निकामी झालेले खांब हटवण्याची मोहीम हाती घेतल्याची माहिती तालुका हेस्कॉम खात्याच्या कार्यकारी अभियंत्या कल्पना तिरवीर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
ह तालुका जवळपास तीनशे खेडय़ांनी विस्तारलेला आहे. यापैकी जवळपास 219 गावात 1974-75 च्या काळात वीजपुरवठा करण्यात आला. पण त्या वीजपुरवठा कालावधीनंतर जीर्ण झालेल्या तसेच जमिनीवर लोंबकळणाऱया व धोकादायक विद्युत तारा हटवून त्या ठिकाणी नूतनीकरण करण्याची मोहीम आतापर्यंत झाली नाही. प्रत्येक ठिकाणी तात्काळ दुरूस्तीचे काम हाती घेऊन कामचलाऊ सुरू होते. पण गंभीर व धोक्मयाची परिस्थिती लक्षात घेता या लोंबकळणाऱया व धोकादायक तारा हटवणे अत्यंत गरजेचे होते. अनेक गावांमध्ये विद्युतखांब जीर्ण होऊन मोडकळीला आले आहेत. शिवाय अनेक ठिकाणी घरच्या वीजकनेक्शनसाठी भरमसाठ जोडण्या केल्याने वीजपुरवठय़ातही व्यत्यय येत आहे. अनेक ठिकाणी सुसाट वारा व पावसामुळे जुन्या वाहिन्या तुटून पडल्यामुळे अपघातांचे प्रकारही अनेक ठिकाणी घडले आहेत. त्यामुळे चाळीस वर्षांपूर्वीच्या जीर्ण वाहिन्या व विद्युतखांब हटवून नुतनीकरण करण्यासाठी हुबळी विभाग विद्युत निगमकडे पाठपुरावा केला होता. यासाठी सर्वेक्षण करून अनेक गावांची निवड करण्यात आली होती. गेल्या सहा महिन्यापूर्वी याचा पाठपुरावा केला गेला होता. याची दखल घेऊन बेळगाव ग्रामीण विभाग कार्यकारी अभियंता प्रवीण कुमार चिकाडे यांनी विशेष प्रयत्न करून तालुक्मयाला विशेष प्राधान्य दिले आहे. त्यामधून खानापूर तालुक्मयात आतापर्यंत 163 गावातील जीर्ण विद्युतवाहिन्या व खांब बदलण्याची मोहीम आखली आहे. पूर्वीच्या वीजवाहिन्या कमी क्षमतेच्या होत्या. आता विजन कंडेन्सर विद्युत वाहिन्या घालून सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न हाती घेतले जात आहे. आतापर्यंत तालुक्मयाच्या जांबोटी, लोंढा, नागरगाळी, रूमेवाडी, शिरोली अशा अनेक गावांमध्ये विद्युतवाहिन्या बदलण्याचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेत हेस्कॉम खात्याच्या या उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.
कोरोनाच्या गंभीर काळातही कर्मचाऱयांचे योगदान
तालुक्मयात 24 तास वीजपुरवठय़ासाठी खात्याचे विशेष प्रयत्न सुरू आहेत. गेल्या दोन महिन्यात पावसाळय़ातील संभाव्य अडचण लक्षात घेता खात्याचे अनेक कर्मचारी अहोरात्र झटून सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तालुक्मयाच्या विस्तारित विद्युतपुरवठय़ाच्या मानाने अधिक प्रमाणात वायरमनची आवश्यकता आहे. पण एकूण जागेच्या केवळ 40 टक्के वायरमन सेवेत आहेत. त्यामुळे संपूर्ण भागात एकाचवेळी लक्ष देणे कठीण जात आहे. कोरोना गंभीर काळातही आजारपण बाजूला ठेवून अनेक कर्मचाऱयांनी सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी काम केले आहे. जंगल भागात काम करताना वनखात्याचा अडसर होत आहे. वीजवाहिन्यांवर येणारी झाडे निकामी करण्यासाठी वनखात्याची अडचण येत असल्यामुळे रात्रीच्या वेळी होणारा खंडित वीजपुरवठा सुरळीत करताना हेस्कॉम खात्याची चांगलीच ससेहोलपट होत आहे. यामुळे हेस्कॉम खातेही हैराण झाले आहे.
24 तास वीजपुरवठय़ासाठी प्रयत्नशील
खानापूर तालुका हा दुर्गम व जंगलमय प्रदेशातून विस्तारलेला प्रदेश आहे. तालुक्मयाच्या अनेक भागात जंगलातून जाणाऱया जीर्ण विद्युत वाहिन्या यापूर्वी बदलण्यात आल्या आहेत. आता गावागावात 40 वर्षांपूर्वी घातलेल्या विद्युतवाहिन्या व जीर्ण खांब हटवून त्या ठिकाणी नवीन विद्युतवाहिन्या घालण्यासाठी विशेष योजना आखली आहे. आतापर्यंत तालुक्मयात 163 गावांमध्ये ही योजना पूर्णत्वाला आली असून उर्वरित गावात टप्प्याटप्प्याने कामे हाती घेण्यात येणार आहेत. शिवाय तालुक्मयात निरंतर ज्योती योजनेद्वारे 24 तास वीजपुरवठा करण्यासाठी विशेष प्रयत्न हाती घेण्यात आले आहेत. शिवाय जांबोटी, कोडचवाड याठिकाणी उप वीजकेंद्राची लवकरच उभारणी करण्यात येणार आहे.
– प्रवीण कुमार चिकाडे, जिल्हा ग्रामीण वीजपुरवठा अभियंता
नागरिकांनी सहकार्य करणे आवश्यक
तालुक्मयातील प्रत्येक गावात सुरळीत वीजपुरवठा करण्यासाठी आमचे प्रयत्न आहेत. 1974-75 च्या काळात तालुक्मयाच्या ग्रामीण भागात वीजपुरवठा करण्यासाठी घातलेली विद्युतवाहिनी अनेक ठिकाणी निकामी झाली आहे. त्यामुळे वारंवार तारा तुटणे, खांबे सुटणे, खांब निकामी कमी होणे असे प्रकार होत असल्याने ग्रामीण भागातील जनतेच्या मागणीनुसार जीर्ण व निकामी तारा व जीर्ण खांब हटवण्यासाठी हेस्कॉमच्या विशेष प्रयत्नातून काम हाती घेण्यात आले आहे. बऱयाच गावांमध्ये कामे पूर्णत्वाला आली आहेत. आणखीन काही गावात कामे सुरू आहेत. त्यासाठी ग्रामीणमधील नागरिकांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी सहकार्य करावे.
– श्रीमती कल्पना तीरविर तालुका हेस्कॉम कार्यकारी अभियंत्या