नवी दिल्ली
विदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदारांनी शेअर बाजारात एप्रिलमध्ये आत्तापर्यंत 13300 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या दोन आठवड्यांमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी ही गुंतवणूक इक्विटी बाजारात केली आहे. मध्य आशियामध्ये इराण आणि इस्त्राइल यांच्यातील संघर्षामुळे आगामी काळामध्ये गुंतवणुकीवर काहीसा परिणाम होऊ शकतो, असे तज्ञांना वाटते आहे. भारत आणि मॉरिशस यांच्यातील तणावामुळे शुक्रवारी शेअर बाजारातून विदेशी गुंतवणूकदारांनी 8027 कोटी रुपयांच्या समभागांची विक्री केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.