ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील स्टार्टअपशी संवाद साधला. या संवादानंतर पंतप्रधान मोदींनी 16 जानेवारी हा दिवस दरवर्षी ‘राष्ट्रीय स्टार्टअप डे’ म्हणून साजरा केला जाईल, अशी घोषणा केली.
मोदी म्हणाले, या दशकात इनोव्हेशन, इंटरप्रेन्यूरशीप आणि स्टार्टअप इकोसिस्टिमला मजबूत करण्यासाठी सरकार मोठय़ा प्रमाणात बदल करत आहे. त्याची तीन महत्त्वाची वैशिष्टय़े आहेत. पहिलं वैशिष्यटय़े म्हणजे इंटरप्रेन्यूरशीपला सरकारी प्रक्रियांच्या जाळय़ातून ब्युरोक्रॅटिक्स सिलोसपासून मुक्त करणे, दुसरं वैशिष्टय़े म्हणजे इनोव्हेशनला प्रमोट करण्यासाठी इन्स्टिटय़ूशनल मॅकेनिझमची निर्मिती करणे आणि तिसरं वैशिष्टय़े म्हणजे तरुण इनोव्हेटर्स, युवा उद्योजकांची हँडल होल्डिंग वाढवणे हे आहे.
देशातील विद्यार्थ्यांमध्ये लहानपणापासून नाविन्यपूर्ण गोष्टींकडे आकर्षण निर्माण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. 9,000 हून अधिक अटल टिंकरिंग लॅबमधून मुलांना शाळेत इनोव्हेट करणे, तसेच नव्या कल्पना निर्माण करण्यासाठी संधी देण्यात येत आहे. ज्या स्पीड आणि स्केलने भारत आज युवा स्टार्ट अप तयार करत आहे, त्यातून वैश्विक महामारीतही भारताची प्रबळ इच्छाशक्ती आणि संकल्प अधोरेखित होत आहे. त्यामुळे भारतातील स्टार्टअप्सचा सुवर्ण काळ आता सुरू झाला आहे, असं मला वाटतं, असेही मोदी म्हणाले.