86 स्थानिक दहशतवाद्यांचा खात्मा
वृत्तसंस्था / श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये चालू वर्षात सुरक्षा दलांनी 56 विदेशी दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी दिली आहे. दहशतवादी संघटनांमध्ये सामील 102 स्थानिक दहशतवाद्यांपैकी 86 जणांना ठार करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दहशतवादाचा मार्ग पत्करणाऱ्या लोकांचे आयुष्य अत्यंत लहान असते. तऊणांनी दहशतवाद नव्हे तर शांतता आणि समृद्धीचा मार्ग अनुसरावा. दहशतवादाला बळ पुरविणाऱ्यांवर कठोर केली जात आहे, दहशतवादाशी निगडित ब्लॉग आणि वेबसाइटवर आमची नजर आहे, त्यांच्या विरोधात एफआयआर नेंदविण्यात आल्याचे दिलबाग सिंह यांनी सांगितले आहे.
आम्ही सर्वप्रकारच्या धमकी देणाऱ्या संघटनांचा खात्मा करणार आहोत. लोकांच्या सुरक्षेवरून सर्वप्रकारची खबरदारी बाळगत आहोत. आमच्या सुरक्षाव्यवस्थेत कुठल्याही प्रकारची त्रुटी नसेल असे दिलबाग सिंह यांनी म्हटले आहे. सीमेपलिकडील प्रशिक्षण शिबिरांमध्ये अद्याप काही जण दहशतवादाचे धडे गिरवत आहेत. भारतीय क्षेत्रात घुसण्याचा प्रयत्न कुणी केल्यास त्याला धडा शिकविला जात आहे. ड्रोनद्वारे शस्त्र पोहोचविण्याचा प्रकार आता एक मोठे आव्हान आहे. यातील काही प्रकरणी गुन्हेगारांना ताब्यात घेण्यास पोलिसांना यश आले आहे. आयईडी आणि इतर स्फोटक सामग्री हस्तगत करण्यात आली असून आम्ही याप्रकरणी प्रभावीपणे उपाययोजना करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.