नवी दिल्ली
पूर्वीच्या तुलनेत इकॉमर्स कंपन्यांचे भारतातील अस्तित्व अलीकडे वाढले असून भारतीय आता ऑनलाइन खरेदीला अधिकाधिक प्राधान्य देत असल्याचे दिसून येते आहे. तरीही भारतातील फक्त 8 टक्के इतके लोकच ऑनलाइन खरेदीला प्राधान्य देतात, असे एका अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. ‘द फ्युचर ऑफ कॉमर्स इन इंडिया- द राइज ऑफ सोशल कॉमर्स’ या अहवालात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. इ-कॉमर्सच्या व्यवहारात भारताचा वाटा दीड ते 2 अब्ज डॉलर्सच्या सरासरी व्यापारी मूल्याइतका असल्याचे सांगण्यात येते. तो 5 वर्षात 16 ते 20 अब्जच्या पार जाईल असाही अंदाज आहे.