कोलकाता / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील जलपैगुडी येथे बुधवारी संध्याकाळी दुर्गा माँ मूर्तीच्या विसर्जनाच्या वेळी मोठी दुर्घटना घडली. मूर्ती विसर्जनाच्या वेळी माळ नदीत मुसळधार प्रवाह आल्याने 8 जणांचा मृत्यू झाला. 13 जणांना वाचविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जलपैगुडीचे खासदार देवषी दत्ता यांनी दिली. या घटनेची माहिती मिळताच एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली होती. दुर्घटनेवेळी शेकडो लोक विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते. दरम्यान, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या घटनेप्रती शोक व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या घटनेसंबंधी दुःख व्यक्त केले आहे.
राजस्थानमध्ये 6 जणांचा मृत्यू
राजस्थानमधील अजमेरमध्ये मूर्ती विसर्जनाच्या वेळी बुडून सहा जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये काका-पुतण्याचाही समावेश आहे. एका तरुणाचा पाय घसरल्यानंतर त्याला वाचवण्यासाठी एक एक करून आणखी 5 तरुण पाण्यात उतरले. बचावासाठी पाण्यात उडय़ा घेणारे सर्वजण बुडाले. बऱयाच प्रयत्नानंतर गावकऱयांनी गुरुवारी सकाळी सहाही जणांचे मृतदेह पाण्याबाहेर काढले. अजमेरमधील नसीराबाद येथील नांदला भागात ही पाण्यातील दलदलयुक्त गाळामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.