चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत निर्णय : प्रशासनाच्या आदेशाची वाट बघणार नाही : व्यापाऱ्यांची आक्रमक भुमिका
प्रतिनिधी / कोल्हापूर :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे गेल्या अडीच महिन्यांपासून अत्यावश्यक सेवा वगळात इतर सर्व व्यवसाय, दुकाने बंद आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे उत्पन्न थांबले आहे. माप्त विविध कर, कर्मचारी पगार, वीज बिल, कर्जाचे हप्ते असे खर्च थांबलेले नाहीत, ते नियमित सुरुच आहेत. त्यामुळे व्यापारी, दुकनदार वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे. प्रशासनाने परवानगी न दिल्यास अवस्था आणखी बिकट बनणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या आदेशाची आता वाट बघणार नाही, सोमवारपासून शहरातील सरसकट सर्व दुकाने उघडण्याचा निर्णय चेंबर ऑफ कॉमर्सच्या बैठकीत झाल्याचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.
शहरात कोरोनाच्या दूसऱया लाटेत संसर्ग वाढल्याने शहराती दुकाने 15 एप्रिलपासून बंद आहेत. दुकाने बंद करुन अडीच महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप दुकाने सुरु करण्याबाबत प्रशासन सकारत्मक दिसत नाही. पुणे, मुंबई सारख्या शहरात कोरोनाचा संसर्ग अटेक्यात आला. मात्र कोल्हापुरातील संसर्ग अद्याप अटोक्यात नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. प्रशासनाच्या दूर्लक्षामुळेच जिल्ह्यात अद्याप चौथ्या टप्प्यात आहे. व्यापाऱ्यांची दुकाने बंद असली तरी त्यांचा खर्च थांबलेला नाही. उत्पन्न नसताना खर्चाचा ताळमेळ बसविताना व्यापारी मेटाकुटीला आहेत.
शासनाकडून कोणत्याही सवलती व्यापाऱयांना देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे आत्ता जर दुकाने सुरु करण्यास परवानगी न दिल्यास व्यापाऱ्यांवर आत्महत्या करण्याशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. अशा कठीण परिस्थितीत प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या व्यथा देखिल जाणून घेणे गरजेचे आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. त्यामुळे आता शासनाच्या परिपत्रकाची वाट न पाहता सोमवारपासून सर्व दुकाने सुरु करण्याची आक्रमक भुमिका व्यापाऱ्यांनी घेतील आहे. चेंबर ऑफ कॉमर्स आणि संलग्न संस्था यांच्यामध्ये शनिवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला आहे. व्यापरी त्यांच्या मतावर ठाम राहणार असल्याचे चेंबरचे अध्यक्ष शेटे यांनी सांगितले.