मनोरंजन कोणाला नको असते? जीवनातील कंटाळवाण्या नित्यक्रमापासून तात्पुरती सुटका मनोरंजनाच्या विविध माध्यमातून होते. एखादी गूढ कथा सांगून विस्मित करणारे पुस्तक असो, आवडते संगीत किंवा चित्रपट, या सर्वांचेच आपल्या आयुष्यात खूप महत्त्व आहे कारण ते थेट जाऊन आपल्या मनावर प्रभाव करतात.
सध्याच्या महामारीच्या काळात, तणावमुक्ती माध्यमांचे महत्त्व अधिकच जाणवत आहे. कामावरून दमून आल्यानंतर, आपल्या कुटुंबासोबत बसून एखादा विनोदी चित्रपट पाहणे, त्यातील मंत्रमुग्ध करणाऱया संगीताचा आस्वाद घेणे, या सगळय़ाने मेंदूवरचा ताण कमी होतो यात काही वादच नाही. आपल्या आवडत्या अभिनेत्याला चित्रपटात जग जिंकताना पाहून ऊर्जा नक्कीच मिळते, पण ती महत्त्वाकांक्षा कितपत वास्तवाला धरून असते हे मात्र विवादास्पद आहे.
एक चित्रपट घडवण्यामागे अनेक लोकांचा हात असतो. चित्रपटाच्या निर्मितीत जेवढा एखादा अभिनेता/अभिनेत्री महत्त्वाचे आहेत, तेवढेच महत्त्व पडद्यामागच्या लोकांचे असते. आजवर आपण कित्येकदा चित्रपट पहायला गेलो असू, पण किती वेळा आपण, चित्रपट संपल्यावर लक्ष देऊन शेवटी (किंवा सुरुवातीला) येणाऱया नावांची दखल घेतली आहे का? विज्ञान आणि गणित सोडून इतर कलेसंबंधित क्षेत्रांबद्दल समाजात जागरूकता हळूहळू वाढू लागली आहे. लोक ठरावीक समाज-मान्य व्यवसायाच्या पलीकडे जाऊन, स्वतःचे संभाव्य ओळखून नवनवीन क्षेत्रात पदार्पण करू लागले आहेत. पूर्वी अनादरणीय मानल्या जाणाऱया मनोरंजन क्षेत्राकडे बघायचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. पण अजूनही या क्षेत्राला योग्य ती मान्यता समाजात मिळालेली नाही. या उद्योगाची पद्धत जरी अपारंपरिक असली, तरी ते घडवून आणायला बुद्धिमत्ता, कष्ट आणि तेवढाच ध्यास लागतो.
दोन अडिच तासांचा तो चित्रपट बनवायला बरेचदा अनेक महिने किंवा वर्षेही लागू शकतात. सुरुवात होते ती एका कल्पेनेपासून. त्या कल्पनेला सर्जनशीलतेची साथ मिळाली की एक कथा निर्माण होते. माणूस रोजच्या आयुष्यात जेव्हा अडकून समोर येईल ते स्वीकारत असतो, तिकडे समाजमान्य चौकटीच्या बाहेर जाऊन एक नवीन जग निर्माण करण्याची कलाही खरंच किती विलक्षण आहे. जो माणूस असा विचार करू शकतो, तो जगाच्या निरंतर अपेक्षांपासून मुक्त होऊन, आपल्या आयुष्याला एक नवीन दृष्टिकोन देतो.
पण या जगात, तुमची कल्पना कितीही क्रांतिकारक असली, तरी काही आर्थिक, सामाजिक आणि मनुष्यबळाच्या आधाराशिवाय ते लोकांपर्यंत पोहचत नाही. अशा वेळेला निर्मात्यांकडून मिळालेली आर्थिक मदत आणि त्याने गोळा केलेल्या सहकाऱयांमुळे त्या कल्पनेला आकार मिळतो. पडद्यावर आपल्याला जे काही दिसते, ते शक्मयतो सहेतुक मांडलेले असते. अगदी अभिनेता/अभिनेत्रींच्या पोशाखापासून ते मागे एका कोपऱयात असलेल्या शो पीसपर्यंत सगळे विचारपूर्वक आयोजित केले जाते. याचे कारण म्हणजे या सर्व गोष्टी या खरंतर चित्रपटाचाच भाग असतात पण त्या थेट प्रभाव न पाडता, सुप्त मनावर प्रभाव पाडत असतात. जर चित्रपटाचा नायक गरीब असेल आणि तो महागडी गाडी चालवत असेल, तर ते तांत्रिकदृष्टय़ा योग्य आहे का? अजिबात नाही. त्यामुळे पडद्यावर दाखवले जाणारे घर, त्यातील वस्तू, कपडे, जागा, भाषा, इत्यादीचा खूप खोलवर जाऊन विचार केला जातो. समाजाचे मानसशास्त्र समजण्याची ही कला खूप दुर्मीळ आहे.
ऍपलचे संस्थापक, स्टिव्ह जोब्स यांनी म्हटले आहे, ‘कोणताही महान व्यवसाय हा एकटय़ाने होऊ शकत नाही. त्याला महान बनवण्यामागे नेहमी एका टीमचा हात असतो.’ कधी विचार केला आहे का की संगीताशिवाय एक चित्रपट तेवढाच प्रभावी होईल का? किंवा एखाद्या भीतीदायक चित्रपटाला आनंदी संगीत जोडले तर तो चित्रपट तेवढाच प्रभावी ठरेल का? म्हणूनच सर्जनशीलतेला कला असे म्हटले आहे. केवळ माणसाच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर असे काही निर्माण करणे, जे अद्वितीय आहे, तांत्रिकदृष्टय़ा योग्य आहे आणि त्याहून प्रभावी आहे.
हे सर्व घटक जेव्हा पुरेपूर साध्य होतात, तेव्हा कुठेतरी अभिनेता/अभिनेत्रींचे काम सुरु होते. त्या वेळेलादेखील अनेक लोक, जसे की मेक-अप करणारी माणसे, केशभूषालय, कॅमेरा-टीम, चहा पाणी पुरवणारे ते आचारी, इत्यादी पडद्यामागे तेवढय़ाच उल्हासाने काम करत असतात जेवढे पडद्यावर दिसणारे ते ओळखीचे चेहरे. एवढेच कशाला, एखाद्या गाण्यात जितक्मया ऊर्जेने अभिनेता/अभिनेत्री नाचताना दिसतात, तितक्मयाच ऊर्जेने पडद्यामागे असलेले कलाकारदेखील नाचतात. कित्येक जण नायक/नायिकांच्या मागे नाचताना स्वतः प्रसिद्ध नायक/नायिका व्हायचे स्वप्न पाहत असतात. कारण त्याशिवाय त्यांच्या प्रतिभेला कृतज्ञता मिळत नाही. मग ते कितीही चांगले नाचले, गायले तरीही केवळ त्या पडद्यावरील स्थानामुळे त्यांना मान्यता मिळत नाही.
बरेचदा असेदेखील होते की चित्रपटाची गोष्ट, त्यात दर्शवलेल्या घडामोडी योग्य किंवा प्रभावी नसल्या तरी केवळ आवडते कलाकार त्यात असल्यामुळे तो चित्रपट गाजतो. आणि त्याउलट म्हणजे कित्येक चित्रपट कलेच्या, गोष्टीच्या आणि सामाजिक प्रभावाच्या दृष्टीने श्रे÷ असतात. पण केवळ प्रसिद्ध कलाकार त्यात नसल्याने तो चित्रपट मागे पडतो. अशा वेळेला समाजाला हे लक्षात येत नाही की एक उपभोक्ता म्हणून त्यांच्या हातात केवढी मोठी शक्ती आणि जबाबदारी आहे. निव्वळ कलेच्या गुणवत्तेवर आपण जर या माध्यमांना पारखले तर आपण समाजात सकारात्मक मजकूर पसरवायला मदत करू. एवढेच नाही तर समाज म्हणून माणसाला त्याच्या गुणवत्तेवर पारखायला सुरू करू आणि त्याचा ओळखींमुळे, किंवा फक्त बाहय़रूपामुळे नाही. यामुळे समाजात हळूहळू एक समावेशक दृष्टिकोन निर्माण होईल आणि लोकांना आपल्या स्वप्नांकडे भरारी घेण्याचे बळ मिळेल.
अभिनेता/अभिनेत्रींच्या कामामुळे प्रेरित होणे साहजिक आहे. कारण त्यांचे कामच लोकांना प्रभावीत करण्याचे आहे. पण याचा अर्थ असा नाही की त्यांचे आयुष्य परिपूर्ण आहे आणि त्याचाच आदर्श घेऊन आपण पुढे चालले पाहिजे. असे कित्येक लोक आहेत, जसे की आरोग्य कर्मचारी, सीमेवर आपल्या प्राणाची आहुती देणारे जवान, सफाई कर्मचारी जे रोज आपल्या कार्याने आपले जीवन थोडेथोडे सोपे करायचा प्रयत्न करत असतात. प्रत्येकाचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन, आवडी निवडी भिन्न असतात. त्यामुळे एकच विचारांचा साचा समाजावर लागू पडू शकत नाही, पण समाजातील घडामोडींबद्दल जागरूकता हे सगळेच पाळू शकतात.
शेवटी आपणदेखील समाजाचाच भाग आहोत, तर आपल्या आजूबाजूला घडणाऱया गोष्टी या सकारात्मक आणि क्रांतिकारक करण्याची जबाबदारीदेखील आपलीच आहे. समाजाला बदलायचा ध्यास धरायच्या आधी, स्वतःचा दृष्टिकोन बदलून बघितला तर समाज आपोआप बदलेल. तर मग आता विचार करायला हवा, खरा नायक कोण?
श्राव्या माधव कुलकर्णी