लोकसभेत गृहराज्यमंत्र्यांचे विधान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रोहिंग्या घुसखोर हे देशाच्या सुरक्षेसाठी धोकदायक आहेत. रोहिंग्या घुसखोर हे अवैध कारवायांमध्ये सामील असल्याची माहिती संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱया दिवशी लोकसभेत देण्यात आली आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद रार यांनी बसप खासदार रितेश पांडे यांच्या प्रश्नाला लेखी उत्तर दिले आहे.
रोहिंग्या समवेत सर्व घुसखोर देशाच्या सुरक्षेसाठी धोकादायक आहेत. हे घुसखोर अवैध कारवायांमध्ये सामील असल्याचे समोर आले आहे. सर्वोच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून यात भारतातून रोहिंग्यांचे प्रत्यार्पण न करण्याची मागणी करण्यात आली आहे. हे प्रकरण अद्याप प्रलंबित आहे, पण न्यायालयाने प्रत्यार्पणाला स्थगिती दिलेली नसल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.
अवैध घुसखोर कुठल्याही दस्तऐवजाशिवाय भारतात प्रवेश करत असल्याने त्यांच्या संख्येची कुठलीच नोंद नसल्याचे गृहराज्यमंत्र्यांनी मागील वर्षी संसदेत सांगितले होते. 2019 मध्येही राय यांनी रोहिंग्यांच्या संख्येबदद्ल कुठलीच नोंद नसल्याचे म्हटले होते.
म्यानमार सरकारने 1982 मध्य राष्ट्रीयत्व कायदा आणला होता, ज्यात रोहिंग्या मुस्लिमांचा नागरिकत्वाचा दर्जा संपविण्यात आला होता. तेव्हापासूनच रोहिंग्या मुस्लीम शेजारी देशांमध्ये घुसखोरी करत आहेत. रोहिंग्यांचा समावेश असलेली एक दहशतवादी संघटनाही उपखंडात कारवाया करत आहे.