नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचा शपथविधी होऊन चोवीस तास उलटण्याच्या आतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली आहे. चन्नी हे एका महिलेला आक्षेपार्ह संदेश पाठविण्याच्या प्रकरणात अडकले असून अशी व्यक्ती मुख्यमंत्री कशी होऊ शकते असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. 2018 मध्ये चन्नी यांनी एका महिला अधिकाऱयाला हा एसएमएस पाठविला होता. त्यावेळचे मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी चन्नी यांना या महिलेची क्षमायाचना करण्यास सांगितले होते.