एर्नाकुलम, इडुकके, थ्रिसूरमध्ये रेड अलर्ट
इडुक्की / वृत्तसंस्था
दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये सध्या जोरदार पर्जन्यवृष्टी आहे. तामिळनाडूत कोसळलेल्या दमदार पावसानंतर आता केरळमध्ये गेल्या दोन दिवसांपासून परतीच्या पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्यात बऱयाच भागात पाऊस सुरू असून मध्य केरळमधील एर्नाकुलम, इडुक्की आणि थ्रिसूरमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिरुअनंतपुरममध्ये अजूनही मुसळधार पावसाचा अंदाज असून कोल्लम, पठानमथिट्टा, अलाप्पुझा, कोट्टायम आणि इडुक्की जिह्यांमध्ये अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला जात आहे.
केरळमध्ये शनिवारी पहाटेपासून गडगडाटासह पाऊस सुरू झाला होता. या पावसामुळे धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. पाणीपातळी वाढल्याने इडुक्कीमधील चेरुथोनी धरणाचे दोन दरवाजे रविवारी दुपारी उघडण्यात आले. साहजिकच पाणलोट क्षेत्रामध्ये पुराची समस्या निर्माण झाली आहे. परतीच्या या पावसामुळे नद्या-नालेही भरून वाहू लागले आहेत. दमदार पावसामुळे संबंधित यंत्रणांना सतर्क करण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री रोशी ऑगस्टीन यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली आहे. धरणांच्या पातळीबरोबरच काही शहरी भागांमध्ये पाणी तुंबल्याच्या घटना घडल्याने जनजीवन आणि वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पेरियार येथे रविवार सकाळपासून दमदार पाऊस कोसळल्यामुळे बराच भाग जलमय झाला होता. मुसळधार पावसामुळे दक्षिण केरळमधील अनेक भागांमध्ये रस्ते जलमय झाले असून काही भागांमध्ये भूस्खलनही झाले आहे. पथनमथिट्टाच्या जिल्हा प्रशासनाने मुसळधार पाऊस झालेल्या भागांना अत्यंत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. तसेच विशेषतः नदीकाठी किंवा भूस्खलनप्रवण भागात राहणाऱयांना अधिक सतर्क केले. भूस्खलन आणि पूरग्रस्त भागातील लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्याचा सल्ला दिला आहे. पथनामथिट्टा आणि कोल्लम जिल्हय़ातील विविध भागात रस्ते पाण्याखाली गेले असून येथे ऑरेंज अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
केरळबरोबरच तामिळनाडूतही जोरदार पाऊस सुरू आहे. येथील मुल्लापेरियार धरणातील पाण्याची पातळी 140 फुटांवर पोहोचली आहे. परिणामी, पेरियारच्या दोन्ही बाजूला राहणाऱया लोकांना अधिक सतर्क करण्यात आले आहे. येत्या 24 तासांत पाण्याची पातळी आणखी वाढल्यास धरणाचे शटर उघडले जाऊ शकतात आणि जास्त पाणी ओव्हरफ्लो होण्याची शक्मयता इडुक्की जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली. संततधार पावसामुळे शनिवारी केरळच्या काही भागात किरकोळ भूस्खलन झाले आणि रेल्वेसेवा विस्कळीत झाल्यामुळे अधिकाऱयांनी डोंगराळ भागात, नदीकाठी आणि पर्यटन केंद्रांमध्ये अत्यंत सावधगिरी बाळगण्यास सांगितले.