माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख
कोल्हापूर/प्रतिनिधी
महाविकास आघाडी सरकारच्या एकुण कारभारावर समाजातील कोणताही घटक समाधानी नाही.त्यामुळे जनतेत सरकारविरोधात असंतोष वाढत आहे.त्यामुळे राज्य सरकार विरोधात भाजपा आरपारची लढाई लढण्यासाठी सज्ज आहे. असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले.
भाजपाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यकारणी बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर, विभाग संघटनमंत्री मकरंद देशपांडे यांची प्रमूख उपस्थीती होती.
यावेळी देशमुख म्हणाले,विश्वासघाताने आलेले हे महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला विनाशाकडे नेत आहे. या सरकारला महाराष्ट्राच्या जनतेशी काही देणे घेणे नाही.अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. यासाठी भाजपा येत्या काळात या सरकारचे दोष जनतेपर्यंत घेऊन जाईल.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी प्रामाणिकपणे कर्ज भरणा-या शेतकऱ्यांना ५० हजार,रूपयांचे जाहीर केलेले प्रोत्साहन अनुदान महापूरातील नुकसान भरपाई त्वरीत द्यावी. अशी मागणी केली अशी मागणी केली.
यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव जिल्हा परिषद सदस्या विजयाताई पाटील यांनी मांडला. त्यास डॉ. अजय चौगले यांनी अनुमोदन दिले. महाविकास आघाडीच्या निष्क्रियतेचा प्रस्ताव संदिप पाटील यांनी मांडला.त्यास संभाजी आरडे यांनी अनुमोदन दिले.
यावेळी प्रदेश कार्यकारिणी सदस्य हिंदुराव शेळके, शिवाजीराव पाटील, भगवान काटे, सुनिल मगदूम, जि.प.सदस्य अशोकराव माने, राहूल देसाई, नाथाजी पाटील, डॉ. सुभाष जाधव,दत्ता मेडसिंगे, मंडल अध्यक्ष, जिल्हा पदाधिकारी, आघाडी अध्यक्ष, सेल संयोजक पदाधिकारी उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस विठ्ठल पाटील यांनी केले. आभार उपाध्यक्ष मोहन वाईंगडे यांनी मानले.