विजयवाडा
तेलंगणाच्या निजामाबाद येथे राहणाऱया 4 जणांच्या एका कुटुंबाने शनिवारी पहाटे विजयवाडा येथे कथितरित्या आत्महत्या केली आहे. आई आणि मुलाने इन्सुलिनच्या मोठय़ा डोसचे इंजेक्शन टोचून घेत स्वतःचा जीव दिला, तर वडील आणि अन्य पुत्र प्रकाशम बैराज यांनी कृष्णा नदीत उडी घेतली आहे. आत्महत्येच्या कारणांचा अद्याप शोध लागलेला नाही, परंतु आर्थिक संकटामुळे कुटुंबाने हे पाऊल उचलले असल्याचे मानले जात आहे.
पप्पुला सुरेश (56 वर्षे), श्रीलता (54 वर्षे), अखिल (28 वर्षे) आणि आशीष (24 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. सुरेश हे निजामाबादमध्ये मेडिकल स्टोअर चालवत होते. तर अखिलने पेट्रोल पंप भाडेतत्वावर चालविण्यासाठी घेतला होता. आशीष हा फार्मसीचा विद्यार्थी होता. सदर कुटुंब 6 जानेवारी रोजी विजयवाडा येथे आले होते.