प्रतिनिधी/ सातारा
साताऱयाचे ऐतिहासिक असे श्री. छ. प्रतापसिंह नगरवाचनालयाच्या पंचवार्षिक निवडणूकीसाठी रविवारी मतदान झाले. मतमोजणीची प्रक्रिया सांयकाळी उशीरा सुरु झाली कारणास्तव ती थांबवण्यात आली. सोमवारी सकाळी 11.30 वाजता पुन्हा सुरु करण्यात आली. दुपारी दीड वाजेपर्यंत संपूर्ण निकाल हाती आला. सत्ताधारी ग्रंथमित्र पॅनेलने विरोधकाना नाक सुद्धा वर काढू दिले नाही. त्यांच्या चारीमुंडय़ा चित करत दारुण पराभव केला. विजयी उमेदवारांनी जल्लोष केला. सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन सातारा शहरातील नगरवाचनालाचे सभासद, हितचिंतकांनी केले.
सातारा नगरवाचनालयाकरता मतदानाची प्रक्रिया रविवारी पार पडली. विश्वस्त आणि कार्यकारीणी मंडळ अशी निवडणूक झाली. दोन्हीसाठी ग्रंथमित्र पॅनेल विरुद्ध विद्रोही कार्यकर्ते विजय मांडके यांच्या विचारांच्या चार जणांनी निवडणूकीच्या रिंगणात उतरले होते. 1923 मतदारांपैकी 637 मतदान झाले. त्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ऍड. नितीन शिंगटे यांनी कामकाज पाहिजे. मतमोजणीची प्रक्रिया रविवारी सायंकाळी उशीरा सुरु झाली होती. बंद करुन पुन्हा सोमवारी सकाळी 11.30 वाजता सुरु करण्यात आली. त्यामध्ये ग्रंथमित्र पॅनेलचे सर्वच उमेदवार घवघवीत मतांनी विजयी झाले. श्री. छ. प्रतापसिंह महाराज (थोरले) नगर वाचनालय निवडणूकीत विश्वस्त समिती विजय उमेदवार डॉ. संदीप श्रोत्री 179 मते, विजयराव पंडित 167 मते, अनंत जोशी 166 मते, ऍड. सचिन तिरोडकर 148 मते, तर कार्यकारी मंडळ विजय उमेदवारांमध्ये डॉ. रविंद्र भारती – झुटिंग 522 मते, डॉ. राजेंद्र माने 497 मते, डॉ.ज्योत्स्ना कोल्हटकर 486 मते, सौ वैदेही कुलकर्णी 479 मते, डॉ. शाम बडवे 475 मते, विजयकुमार क्षीरसागर 435 मते, प्रदीप कांबळे 421 मते, प्रकाश शिंदे 412 मते मिळाली आहेत. विजयी उमेदवारांनी जल्लोष केला.
रवींद्र झुटींग यांचे रेकार्ड
रवींद्र झुटींग हे व्यक्तीमत्वच वेगळे आहे. वाचकांच्या, साहित्यिकांच्यामध्ये वाचन चळवळ रुजवण्यासाठी स्वतः नाविण्यपूर्ण उपक्रम राबवत असतात. नगरवाचनालयाची सेवा चांगली आणि सुखकर कशी करता येईल यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न असतो. त्यामुळेच मतदारांनी दुसऱयांना त्यांना निवडून देत विक्रमी मतदान केले आहे.
डॉक्टर आणि साहित्यिकांनाच पसंती
शब्दांची खाण, शब्दांची जाण आणि शब्दांचे ज्ञान असलेली मंडळीच निवडून आलेले आहेत. त्याची प्रचिती नुकतीच आलेली असून डॉ. राजेंद्र माने यांच्या कथा, कादंबऱया असतील डॉ. संदीप श्रोत्री यांची प्रवासवर्णने असतील तर प्रदीप कांबळे यांचे काव्य असतील हे सर्व मतदारांना सर्व श्रूत आहे. सातारा शहरातील साहित्य चळवळ वाढवण्यासाठी जशा ज्योत्स्ना कोल्हटकर, वैदही कुलकर्णी कार्य करतात तसेच ऍड. सचिन तिरोडकर यांचेही काम चांगले आहे. त्यामुळेच मतदारांनी गुलाबाचे फुल हे चिन्ह पहिल्या पसंतीचे ठरले अन् विरोधकांचा त्यांनी सफाया केला.