वृत्तसंस्था/ मुंबई
2022 रणजी क्रिकेट हंगामासाठी मंगळवारी मुंबई रणजी संघाची घोषणा करण्यात आली. या संघामध्ये सचिन तेंडुलकरचा चिरंजीव अर्जुन तसेच अजिंक्य रहाणेचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई संघाचे नेतृत्व पृथ्वी शॉकडे सोपविण्यात आले आहे.
रणजी स्पर्धा यावेळी दोन टप्प्यात खेळविली जाणार आहे. 2022 रणजी स्पर्धा 62 दिवसांत घेतली जाणार असून एकूण 64 सामने खेळविले जातील. या स्पर्धेचा पहिला टप्पा 10 फेब्रुवारी ते 15 मार्च तर दुसरा टप्पा 30 मे ते 26 जून दरम्यान राहील. या दोन टप्प्यांच्या मध्यंतरी आयपीएल स्पर्धा खेळविली जाणार आहे.
मुंबई रणजी संघ- पृथ्वी शॉ (कर्णधार), जसवाल, अजिंक्य रहाणे, गोमेल, अरमान जाफर, सर्फराज खान, सचिन यादव, अदित्त्य तरे, हार्दिक तेमोरे, शिवम दुबे, अमन खान, मुलानी, कोटियान, प्रशांत सोळुंकी, शशांक अत्रादे, धवल कुलकर्णी, मोहित अवस्ती, प्रिन्स बदानी, सिद्धार्थ राऊत, रॉयस्टन डायस आणि अर्जुन तेंडुलकर.