उपाळे मायणी येथे मोफत जिल्हास्तरीय आरोग्य शिबिर संपन्न
कडेगाव/प्रतिनिधी
राजकारण हे क्षणभंगुर आहे. जे काही करता येईल ते आपल्या भागातील लोकांसाठी काम केले पाहिजे सांगली जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून काम करतांना सर्वांना समान न्याय देण्याचे काम केल्याचे प्रतिपादन माजी जि. प. अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केले. ते उपाळे मायणी (ता.कडेगांव) या ठिकाणी लोकनेते आमदार संपतराव देशमुख यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ मोफत जिल्हास्तरीय आरोग्य महाशिबीरामध्ये बोलत होते.
यावेळी आशाताई पाटील सभापती शिक्षण, क्रीडा व आरोग्य समिती जि. प. सांगली, जगन्नाथ माळी सभापती, अर्थ व बांधकाम समिती, सुनीताताई पवार सभापती, महिला व बालकल्याण समिती, जिप. सांगली यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी बोलतांना जगन्नाथ माळी म्हणाले, मला लेखी जिल्हा परिषद अध्यक्ष काय असतो हे संग्राम भाऊ कडून शिकायला मिळाले त्यांनी आपल्या कामगिरीमुळे एक वेगळा ठसा उमटवला म्हणुनच मला येथे म्हणावे लागेल की संपतराव देशमुख एक तुफान असले तरी त्यांच्या पोटी जन्माला आलेली संग्राम देशमुख हे एक महाभयंकर वादळ आहे.
या आरोग्य शिबिरात बोलताना पुढे संग्राम देशमुख म्हणाले, जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष म्हणून काम करताना जिल्ह्यातील प्रत्येक गाव, वस्ती, वाडी सर्वांना कमीत कमी एक कोटी इतका निधी देण्याचे काम केले व न भुतो भविष्य असा विकास करून दाखवला. आता कडेगाव नगरपंचायती वर भाजपाची सत्ता आलेली आहे आता कडेगाव नगरपंचायतीने कडेगाव ग्रामीण रुग्णालचे शंभर बेडचे हॉस्पिटल काढावे जेणेकरून भविष्यात कोणतीही साथीचा रोग आला तरी आपल्या तालुक्यातील रुग्ण कधी दगावला नाही पाहिजे. या आरोग्य शिबिराचा सर्व ग्रामस्थांनी लाभ घ्यावा व आपले आरोग्य सुदृढ बनवावे अश्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी सभापती मंगलताई क्षीरसागरग पं.स.कडेगाव, प्रा.आशिष घार्गे, उपसभापती, पं. स. कडेगाव, नगराध्यक्ष धनंजय भैया देशमुख, विजय गायकवाड उपनगराध्यक्ष, रेश्माताई साळुंखे, सदस्या जि. प. सांगली, मंदाताई कारंडे, माजी उपसभापती रवींद्र कांबळे आदी पदाधिकारी आणि परिसरातील लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.