वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिजिटल पेमेंट क्षेत्रातील कंपनी फोन पे आपल्या कंपनीतील कर्मचाऱयांची संख्या येत्या काळात दुप्पट करणार असल्याचे समजते.
डिसेंबर 2022 पर्यंत कर्मचाऱयांची संख्या 5 हजार 400 इतकी करण्याचा इरादा कंपनीचा आहे. सध्याला कंपनीत 2 हजार 600 कर्मचारी कार्यरत आहेत. पुढील महिन्यात बेंगळूर, पुणे, मुंबई, दिल्ली आणि देशातल्या इतर शहरांतून भरती राबवून 2 हजार 800 जणांना कंपनीत सामावून घेतले जाणार आहे. अभियांत्रिकी, उत्पादन, ऍनालिटीक्स, व्यवसाय विकास व विक्री संघ अशा विविध विभागात ही भरती होणार आहे.