चित्रपट आणि राजकारण या दोन्ही क्षेत्रात बॉलिवूड अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी खूप नाव कमावले. भाजप सोडून टीएमसीमध्ये दाखल झालेल्या शत्रुघ्न सिन्हा यांनी पश्चिम बंगालमधील आसनसोल लोकसभा मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. आता ‘राजनेता’ बनलेल्या अभिनेत्याने हिंदी चित्रपटसृष्टीत नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिकेतून प्रेक्षकांची मने जिंकली. अभिनयासोबतच शत्रुघ्न आपल्या स्पष्टवक्त्या विधानांसाठी ओळखले जातात. स्पष्टवक्तेपणामुळे त्यांनी अनेकदा आपले नुकसानही केले आहे. ‘एनिथिंग बट खामोशः द शत्रुघ्न सिन्हा बायोग्राफी’मध्ये त्यांनी आपल्या करिअर आणि वैयक्तिक आयुष्याशी संबंधित अनेक रहस्ये उघड केली आहेत.
शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म 9 डिसेंबर 1945 रोजी बिहारमधील पाटणामधील कदमकुआन येथे एका साध्या कुटुंबात झाला. चार भावांमध्ये सर्वात लहान असलेला शत्रुघ्न कोणाची तरी मिमिक्री करतो. राज कपूर हे चित्रपट विश्वातील त्यांचे आयडॉल होते. ते राज कपूरचे चित्रपट पाहायचे आणि कॉपी करायचे. शत्रुघ्न यांना लहानपणापासूनच चित्रपटात काम करण्याची इच्छा होती. पण, त्यांनी शिक्षण घेऊन डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. शत्रुघ्न सिन्हा यांनी वडिलांना न सांगता पुणे फिल्म इन्स्टिटय़ूटचा फॉर्म भरला. त्यानंतर आई आणि भावांनी प्रवेश मिळवून देण्यासाठी मदत केली अन् पुढे त्यांनी मुंबई ही ‘स्वप्नांची नगरी’ गाठली.
शत्रुघ्न सिन्हा यांनी मिस यंग इंडिया आणि अभिनेत्री पूनम चंद्रमणीसोबत प्रेमविवाह केला होता. 27 जून 1965 रोजी पाटण्याहून पुण्याला जात असताना टेनमध्ये भेटले अन् पुढे नातेबंध जुळत गेले. त्यांची मैत्री झाली अन् लवकरच प्रेमात बदलले. पूनम चंद्रमणीच्या आईला शत्रुघ्न सिन्हा अजिबात आवडत नसले तरी नंतर दोघे विवाहबंधनात अडकले. पुढे द्वयींनी आपला संसार फुलवला अन् आता ते राजकीय पटलावर ‘खामोश’ झाले आहेत.