अमृत योजनेंतर्गत साधणार विकास : रस्ते, सौरदिवा, शौचालयांची निर्मिती
प्रतिनिधी /बेळगाव
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त अमृत ग्राम पंचायत योजनेंतर्गत जिल्हय़ातील 65 ग्राम पंचायतींची निवड झाली आहे. निवड झालेल्या गावांतून रस्ते, सौरदिवा, शुद्ध पाणीपुरवठा, डिजिटल ग्रंथालय, उद्याने, सांडपाणी प्रकल्प आदी विकास केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा पंचायतचे सीईओ एच. व्ही. दर्शन यांनी दिली.
राज्यातील ग्राम पंचायतींचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. गावात स्वच्छता राखण्यासाठी ‘स्वच्छ भारत मिशन’अंतर्गत शौचालय आणि सामुदायिक शौचालयांची निर्मिती केली जाणार आहे. याबरोबरच निवड झालेल्या ग्राम पंचायतींमधील कचऱयाची विल्हेवाट लावण्यासाठी विशेष प्रकल्प (प्लांट) बांधण्यात येणार आहेत. ग्रामीण महिलांना सक्षम करण्यासाठी रोजगार हमी योजना राबविली जात आहे. याअंतर्गत गावागावांतून तलावांची खोदाई केली जाणार आहे.
महात्मा गांधी ‘राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी’ योजनेंतर्गत प्रत्येक नेंदणीकृत कुटुंबाला वर्षभरात 100 दिवस काम देणे बंधनकारक आहे. या माध्यमातून ग्रामीण भागातील कष्टकरी महिलांना काम दिले जाणार आहे. याबरोबरच कृषी, फलोत्पादन आणि सामाजिक वनीकरण विभागामार्फत वृक्षारोपण व इतर शेतकऱयांना फायदेशीर योजना राबविल्या जाणार आहेत.
बेळगाव जिल्हय़ात 500 ग्राम पंचायती व 14 तालुक्मयांचा समावेश आहे. या सर्व तालुक्मयातील 65 ग्रा.पं.ची निवड झाली आहे. निवड झालेल्या ग्राम पंचायतीमध्ये भूजल आणि पर्यावरण संरक्षणावर भर दिला जाणार आहे. यासाठी वृक्षारोपण, तलाव खोदाई आणि इतर योजना राबविल्या जाणार आहेत.