सत्तरी तालुक्यात पावसामुळे काजू उत्पादनावर परिणाम
प्रतिनिधी /वाळपई
सातत्याने पाऊस पडल्यामुळे सत्तरी तालुक्मयातील कृषी बागायतीवर विपरित परिणाम झाला आहे. शेतकऱयांवर नैसर्गिक आपत्ती आली असताना मार्च महिन्यात कृषी खात्यातर्फे देण्यात येणारी अनुदानाची रक्कम अद्याप शेतकऱयांच्या खात्यावर जमा झालेली नाही. यामुळे सत्तरीतील शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे. कृषी खात्याने प्रलंबित असलेली अनुदानाची रक्कम त्वरित शेतकऱयांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणी केली जात आहे.
यंदाचा काजू, आंबा हंगाम पूर्णपणे नुकसानीत आहे. सातत्याने पाऊस पडत आहे .हवामानामध्ये सातत्याने होणाऱया बदलाचा कृषी उत्पादनावर परिणाम झाला आहे. यंदा जवळपास 50 टक्के काजू हंगाम नुकसानीत गेल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी खात्याततर्फे विविध योजनेअंतर्गत अनुदान देण्यात येत असते. मात्र यंदाचे अनुदान अद्याप शेतकऱयाच्या बँक खात्यावर जमा झालेले नाही. लाखो रुपयांची बिले अजून पर्यंत प्रलंबित असल्यामुळे त्याचा परिणात शेतकऱयांच्या आर्थिक व्यवस्थापनावर होणार आहे.
विविध प्रकारची लागवड करणे, आधुनिकरण करणे, कृषी यंत्रे खरेदी करणे, कृषी उत्पादनाचे व्यवस्थान करणे यासाठी कृषी खात्यातर्फे अनुदान दिले जाते. या अनुदानाची रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यात त्वरित जमा होणे गरजेचे असते?. मात्र ही रक्कम अद्याप जमा न झाल्यामुळे आपली आर्थिक फरफट होत असल्याची व्यथा शेतकऱयांनी मांडली आहे.