वृत्तसंस्था / रायपूर
केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल यांनी लोकसंख्या नियंत्रण कायद्याबद्दल वक्तव्य केले आहे. मोदी सरकारला 8 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त छत्तीसगडची राजधानी रायपूर येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान पत्रकारांशी बोलताना पटेल यांनी केंद्र सरकार लवकरच देशात लोकसंख्या नियंत्रणाशी संबंधित कायदा आणणार असल्याचे म्हटले आहे. अशाप्रकारचे मोठे आणि मजबूत निर्णय घेतले जात असताना लोकसंख्या नियंत्रणाच्या कायद्याबद्दल चिंता करू नये, असे उद्गार पटेल यांनी काढले आहेत. लोकसंख्या नियंत्रण कायदा आणण्याची मागणी गेल्या काही वर्षांमध्ये जोर पकडू लागली आहे.