प्रतिनिधी /वाळपई
वाळपई शहराच्या वाहतुकीची समस्या गेल्या दहा वर्षापासून प्रलंबित राहिलेली आहे. सध्या तरी वाळपई शहरातील वाहतूक प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे .यामुळे शाळेच्या मुलांना अक्षरःशा जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. या संदर्भात वेगवेगळे स्तरावरून वाळपई नगरपालिकेवर आरोप करण्यात आल्यानंतर नगरपालिकेने या संदर्भाची दखल घेऊन शेवटी बुधवार दिनांक 13 जुलै रोजी शहराचा वाहतूक आराखडा निश्चित करण्यासाठी बैठक बोलाविली आहे. या बैठकीमध्ये वाहतूक आराखडय़ाला मंजुरी देण्यात येणार असून याबाबत सविस्तरपणे चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान अशा प्रकारच्या बैठका यापूर्वी अनेकवेळा आयोजित करण्यात आल्या. त्या बैठकामध्ये वेगवेगळय़ा स्तरावर चर्चा करण्यात आली .मात्र अजून पर्यंत वाहतूक आराखडा निश्चित झालेला नाही. ही बैठक सुद्धा त्याचाच एक भाग तर नाही ना अशा प्रकारचा सवाल तमाम नागरिक व विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयाची प्रमुख बाजारपेठ वाळपई शहरांमध्ये वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दहा वर्षापासून वाळपई शहरातील वाहतूक नियोजना संदर्भात गांभीर लक्ष देण्यात यावे अशा प्रकारची मागणी अनेकवेळा करण्यात आली .त्या संदर्भात अनेकवेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र अजून पर्यंत वाहतूक आराखडा निश्चित झालेला नाही.
सध्यातरी वाळपई शहरात वाहतुकीचे प्रमाण वाढलेले आहे. खास करून दुपारच्या वेळी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांना जीवघेण्या प्रसंगाला सामोरे जावे लागत आहे. अनेकवेळा विद्यार्थी या वाहतुकीच्या कोंडीमध्ये अडकतात .यामुळे त्यांना घरी जाण्यासाठी प्रवासी बसेस मिळत नाहीत. त्यामुळे अनेक वेळा दूरवर जाणाऱया विद्यार्थ्यांना घरी चालत जावे लागते .शाळा सुरू झाल्यापासून परिस्थिती अधिकच गंभीर बनलेली आहे. यामुळे पालकांनी या संदर्भात नगरपालिकेने गांभीर्याने लक्ष द्यावे अशा प्रकारची मागणी केली होती. त्याचप्रमाणे अनेकवेळा वर्तमानपत्रानी ही समस्या गंभीरतेने घेतली होती. याची विशेष दखल घेऊन नगरपालिकेने बुधवारी दिनांक 13 जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता वाळपई नगरपालिकेच्या सभागृहामध्ये विशेष बैठकीचे आयोजन केले आहे. या बैठकीला नगरसेवक, पोलीस खाते मामलेदार, सामाजिक संस्था, वाळपई शहरातील दुकानदार, वाहतूक खाते पत्रकार यांना निमंत्रित करण्यात आलेले आहे. या बैठकीमध्ये वाहतूक आराखडय़ाला अंतरीम मंजुरी देण्यात येणार आहे. त्यानंतर हा वाहतूक आराखडा अधिसूचित झाल्यानंतर त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
वाहतूक नियोजना संदर्भात ही बैठक अत्यंत महत्त्वाची असून या बैठकीमध्ये वाहतूक आराखडय़ासंदर्भात निर्णय घेण्यात यावा अशा प्रकारची मागणी नागरिक व तमाम विद्यार्थ्यांच्या पालकांनी केली आहे. अन्यथा बैठक फक्त चर्चेपूरती आयोजित न करता त्यातून निर्णय व्हावा अशा प्रकारची मागणी नागरिकांनी केलेली आहे.