गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त पाणीसाठा, जूनचा खंड काढला भरून
पुणे / प्रतिनिधी :
जुलै महिन्यातील दमदार पावसामुळे राज्याचा उपयुक्त पाणीसाठा 42.96 टक्क्यांवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी याच सुमारास असलेला 29.35 टक्के इतका जलसाठा पाहता जूनचा खंड पावसाने भरून काढल्याचे दिसत आहे.
यंदा जूनमध्ये पावसाने ताण दिल्याने राज्यातील धरणांमध्ये अपेक्षित साठा होऊ शकला नव्हता. मात्र, जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पावसाने मान्सूनने सबंध राज्यावर कृपा केली आहे. मागच्या पाच ते सात दिवसांत सर्वदूर दमदार पाऊस होताना दिसत आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर अधिक असून, परिणामी राज्यातील धरणसाठ्यात लक्षणीय वाढ झाल्याचे चित्र आहे.
13 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार, राज्यातील सर्व लघु, मध्यम व मोठ्या धरणांमध्ये कोकण विभागात सर्वाधिक 68.63 टक्के, औरंगाबाद विभागात सर्वात कमी 34.43 टक्के इतका उपयुक्त पाणासाठा आहे. याशिवाय अमरावती विभागात 46.04, नागपूर विभागात 43.73 टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा आहे, तर नाशिक 43.45, तर पुणे विभागात 39.92 टक्के पाणीसाठा आहे.
अमरावती विभागात अकोल्यातील काटेपूर्णा 32.95, अमरावतीतील ऊर्ध्व वर्धा 76.46, बुलढाण्यातील नळगंगा 36.1, यवतमाळमधील बेंबळा 47.72, इसापूर 65.48, अरुणावती 27.88, पूस 30.47 टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात भंडाऱ्यातील गोसीखुर्दमध्ये 36.81, बावनथडी 19.88, चंद्रपुरातील असोळामेंढा 74.74, गडचिरोलीतील दिना 100, गोंदियातील सिरपूर 13.62, इटियाडोह 33.2, वर्ध्यातील निम्न वर्धा 58.38, बोर 49.4 टक्के पाणीसाठा आहे. नागपूर विभागात गोसी खुर्दमध्ये 36.81 टक्के, तातलाडोह 55 टक्के, तर इटियाडोहमध्ये 33 टक्के इतका साठा झाला आहे.
मराठवाड्यातील धरणांमध्ये पाण्याची आवक
औरंगाबाद विभागात पैठण 34.64, बीडमधील मांजरा 31.45, माजलगाव 33.95, हिंगोलीतील येलदरी 60.11, सिद्धेश्वर 10, नांदेडमधील निम्न मनार 92.2, उस्मानाबादेतील निम्न तेरणा 52.03, सिना कोळेगाव 5.55, परभणीतील निम्न दुधनामध्ये 68.34 टक्के पाणीसाठा आहे.
नाशिक विभागातील धरणसाठा निम्म्यावर
नाशिक विभागातील नगरमधील निळवंडे-2 61.68, भंडारदरा 51.55, मुळा 34.34, जळगावातील ऊर्ध्व तापी हतनूर 18.67, नाशकातील कडवा 69.4, वाकी धरण 31.87, अर्जुनसागर 50.78, मुकणे 66.25, भाम धरण 60.36, चणकापूर 38.75, गिरणा 76.5, भावली 91.15, दारणा 65.81, गंगापूर 62.63, पुणेगाव 68.68 टक्के पाणीसाठा आहे.
पुणे विभागातील धरणांमधील साठय़ात वाढ
पुणे विभागात कोल्हापूरमध्ये तुळशी 57.51, राधानगरी 57.77, तिल्लारी धामणे 29.93, दुधगंगा 48.76, पुण्यातील भामा आसखेड 66.44, डिंभे 35.9, चासकमान 68.66, येडगाव 75.72, घोड 23.39, पिंपळगाव जोगे 29.45, माणिकडोह 39.3, वडज 55.97, गुंजवणी 53.82, नीरा देवघर 38.52, भाटघर 41.51, पानशेत 48.67, वरसगाव 45.87, खडकवासला 96.4, पवना 44.79, टेमघर 33.58, सांगलीतील वारणा 53.27, साताऱ्यातील धोम 35.25, उरमोडी 56.94, तारळी 64.81, धोम बलकवडी 52.88, कन्हेर 38.98, कोयना 37.96, वीर 81.43, तर सोलापुरातील उजनीचा साठा 10.25 टक्क्यांवर पोहोचला आहे.
हेही वाचा : राज्यातील पावसाचा जोर ओसरणार
कोकणात समाधानकारक साठा
कोकण विभागात पालघरमधील धामणीत 64.24, कवडास उ बंधारा 100, सिंधुदुर्गातील तिल्लारीमध्ये 84.6, ठाण्यातील निम्न चौंडे 100, भातसा 69.1, ऊर्ध्व घाटघरमध्ये 41.01 टक्के उपयुक्त पाणासाठा आहे.