कृषी खात्याचे दुर्लक्ष, ऐन हंगामात शेतकरी अडचणीत : अधिकारी पाहणी करणार
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हय़ात खताचा तुटवडा निर्माण झाला आहे. विशेषतः युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकऱयांना युरियासाठी फिरावे लागत आहे. कृषी खात्याने मान्सून हंगामादरम्यान जिल्हय़ात मुबलक खताचा साठा असल्याचे जाहीर केले होते. मात्र, यंदाही युरियाची टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱयांतून संतप्त प्रक्रिया व्यक्त होत आहेत.
यंदा खात्याने 7.53 लाख हेक्टर क्षेत्रात पेरणीचे उद्दिष्ट ठेवले आहे. हे क्षेत्र गतवषीपेक्षा 36 हेक्टरनी वाढले आहे. त्यामुळे खताचा साठा अधिक लागणार होता. मात्र, खताच्या तुटवडय़ामुळे शेतकऱयांना धडपड करावी लागत आहे. युरियासाठी सीमाभागातील शेतकरी चंदगड तालुक्मयातील शिनोळी, कोवाड, कुदनूर येथून खरेदी करत आहेत. त्यामुळे वाहतुकीसाठी अधिक पैसे मोजावे लागत आहेत. जिल्हय़ातील रयत संपर्क केंद्रांतून बी-बियाणे आणि खते मिळत नसतील तर रयत संपर्क केंदे कशासाठी? असा सवाल शेतकऱयांतून उपस्थित होत आहे.
अनावश्यक खते घेण्याची सक्ती
खरीप हंगामात शेतकऱयांनी भात, भुईमूग, बटाटा, सोयाबीन, रताळी, कापूस, मका आदी पिकांची पेरणी केली आहे. जून वगळता आतापर्यंत पावसाने उत्तम साथ दिली आहे. त्यामुळे पिकेही जोमाने आली आहेत. मात्र, ऐन हंगामात युरियाची टंचाई निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. एपीएमसी आणि इतर ठिकाणी युरिया मिळत असले तरी त्यासोबत इतर खते घेण्याची सक्ती केली जात आहे.
कृषी खाते दरवषी आवश्यक बी-बियाणे आणि खतांचा पुरवठा केल्याचे घोषित करते. प्रत्यक्षात शेतकऱयांपर्यंत काहीच पोहोचत नाही. त्यामुळे शेतकऱयांना बी-बियाणे अधिक पैसे देऊन खासगी दुकानांतूनच विकत घ्यावी लागतात. त्यामुळे दरवषी शेतकऱयांना आर्थिक फटका सहन करावा लागतो.
विपेत्यांवर कारवाई करणार तालुक्मयात असलेल्या रयत संपर्क केंद्रे आणि कृषी पत्तीन संघांमध्ये बी-बियाणांचा पुरवठा केला आहे. तालुक्मयातील काही खत विक्री दुकानदारांकडून युरियाचा तुटवडा असल्याचे दाखविले जात आहे. मात्र, भरारी पथकाच्या माध्यमातून पाहणी केली जाणार आहे. युरियाचा कृत्रिम तुटवडा निर्माण करणाऱया विपेत्यांवर कारवाई केली जाणार आहे.