सायरस यांच्या मृत्यूनंतर सरकारचे पाऊल
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
टाटा समुहाचे माजी अध्यक्ष सायरस मिस्त्राr यांचा कार अपघातात मृत्यू झाल्यावर केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने कार निर्मात्यांना मागील सीट बेल्टसाठी अलार्म सिस्टीम स्थापित करणे अनिवार्य करण्यासाठीचा मसुदा नियम जारी केला आहे. या मसुद्याच्या अधिसूचनेवर 5 ऑक्टोबरपर्यंत जनतेला सूचना करता येणार आहेत. लोकांच्या प्रतिक्रियेनुसार मसुद्याच्या नियमांमध्ये बदलही केले जाणार आहेत. मंत्रालयाने एन आणि एम वाहनांसाठी मसुदा नियम जारी केला आहे. एम श्रेणी म्हणजे प्रवासी चारचाकी वाहनांसाठी तर एन श्रेणीत चारचाकी परंतु मालवाहतूक तसेच प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱया वाहनानंचा समावेश होतो. 4 सप्टेंबर रोजी 54 वर्षीय सायरस मिस्त्राr यांचा कार अपघातात मृत्यू झाला होता. त्यानंतर केंद्र सरकारकडून मागील सीटवर बसणाऱया प्रवाशांना देखील सीटबेल्ट वापरण्याची सक्ती करणाऱया नियमाबद्दल विचार सुरू झाला.