ऑनलाईन टीम / तरुण भारत :
Rumors of a gang abducting children in Pune पुणे शहरात शालेय मुले पळविणारी टोळी आली असल्याची अफवा पसल्यामुळे पालकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळा, इतर क्लासेससाठी मुलांना सोडविताना पालकांनी चिंता व्यक्त केली आहे. मात्र, नागरिकांनी अफवांना बळी न पडण्याचे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. सोशल मीडियावरील अफवा आणि व्हायरल झालेले फोटो पाहून काळजी न करण्याचेही सूचित केले आहे. त्याशिवाय मुलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांसह पालकांनीही योग्य खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी पळवून नेणाऱ्या टोळी आल्याची अफवा सोशल मीडियावर पसरल्यामुळे पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे शाळा प्रशासन, कुटूंब, नातेवाईकांकडून खबरदारी घेतली जात आहे. मात्र, अशाप्रकारे कोणतीही घटना घडली नसून नागरिकांनी काळजी करू नये. विशेषतः मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर काही विद्यार्थ्यांचे फोटो व्हायरल केले जात आहेत. अमुक-तमूक शाळेतून मुलगा पळविला, मुलाचे अपहरण, अशाप्रकारे अफवांचे पीक जोमात आहे. त्याशिवाय काही शालेय प्रशासनानेही यापार्श्वभूमीवर खबरदारी घेण्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुलांना शाळेतून घरी नेण्यासाठी पालकांनी स्वतः हजर राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच संशयास्पद व्यक्तींसदर्भात जवळच्या पोलीस ठाण्यांना माहिती द्यावी, असेही सांगण्यात आले आहे.
अधिक वाचा : राज्यातील पावसाचा जोर ओसरणार