‘लम्पी’च्या संसर्गजन्य रोगामुळे शेतकरी अडचणीत : व्यापाऱयांना फटका, शेती कामासाठी बैलांची गरज : पण, बंदमुळे मोठय़ाप्रमाणात गैरसोय
प्रतिनिधी /बेळगाव
‘लम्पी’ या जीवघेण्या संसर्गजन्य रोगामुळे मागील दोन महिन्यांपासून एपीएमसीतील जनावरांचा बाजार बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी, व्यापारी आणि विपेत्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. दरम्यान सुगी हंगामाला सुरुवात झाल्याने बैलांची गरज भासते. मात्र जनावरांचा बाजारच बंद असल्याने खरेदी विक्री थांबली आहे. त्यामुळे जनावरे खरेदी कशी करावीत, असा प्रश्न शेतकऱयांसमोर पडला आहे.
‘लम्पी’च्या प्रादुर्भावामुळे जिल्हय़ातील जनावरांचे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकाऱयांनी घेतला आहे. बाजार, शर्यत आदी ठिकाणांहून हा संसर्गजन्य आजार फैलावण्याची शक्मयता असल्याने खबरदारी घेण्यात आली आहे. मात्र सुगी हंगामाला प्रारंभ झाल्यामुळे बटाटा, रताळी, सोयाबीन, भुईमूग काढणीबरोबर पेरणीची कामेदेखील सुरू झाली आहेत. त्यामुळे बैलांची गरज मोठय़ाप्रमाणात भासत आहे. दरम्यान रब्बी हंगामाच्या तोंडावर शेती कसण्यासाठी बैलजोडी खरेदी केली जाते. मात्र बाजारच बंद असल्याने शेतकऱयांसमोर अडचणी वाढल्या आहेत. त्याबरोबर व्यापारी विपेत्यांवरदेखील संकट ओढवले आहे.
मागील दोन महिन्यांपासून जनावरांचा बाजार बंद असल्याने उलाढालही पूर्णपणे थांबली आहे. विशेषतः जनावरांच्या बाजारामध्ये दुभत्या गायी, म्हशींची देखील मोठय़ाप्रमाणात खरेदी-विक्री होते. खरीप व रब्बी हंगामाच्या तोंडावर शेती कामासाठी शेतकऱयांकडून बैलजोडी खरेदी-विक्री केली जाते. मात्र बाजारच बंद असल्याने बैलांची खरेदी-विक्री कशी करावी, असा प्रश्न पडत आहे.
तालुक्मयात 1 लाख 78 हजारांहून अधिक जनावरांची संख्या आहे. त्यामध्ये गाय, म्हैस, बैल, शेळय़ा-मेंढय़ा, घोडा, कुत्रा, गाढव, मांजर आदींचा समावेश आहे. मात्र यंदा लम्पी संसर्गजन्य रोगाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱयांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या रोगाची हजारो जनावरांना लागण झाली असून शेकडो जनावरे मृत्युमुखी पडली आहेत. दरम्यान रोगावर नियंत्रण आणण्यासाठी प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबविण्यात आली आहे. त्यामुळे रोग आटोक्मयात येताना दिसत आहे. मात्र अद्यापही जनावरांच्या बाजार सुरू करण्याला परवानगी मिळाली नाही.
बाजार सुरू करण्याची मागणी
जनावरांच्या बाजारामध्ये बैलजोडी, म्हशी व गायींची खरेदी-विक्री केली जाते. यातून लाखो रुपयांची उलाढालही होते. मात्र बाजारच बंद असल्याने खरेदी-विक्रीबरोबर उलाढालही थांबली आहे. त्यामुळे व्यापारी अडचणीत आले आहेत. येत्या आठवडय़ाभरात सुगी हंगामाला वेग येणार आहे. तत्पूर्वी जनावरांचा बाजार सुरू करावा, अशी मागणी होत आहे.