प्रतिनिधी / खानापूर : शहराला लागून असलेल्या खेमेवाडी गावात गेल्या महिन्यावरापासून पाणी पुरवठा बंद झाला आहे. गावातील नागरिकांचे पाण्याविना हाल होत आहेत. याबाबत हेस्कॉमकडे वारंवार तक्रार करून देखील हेस्कामने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ग्राम पंचायतीने याबाबत पत्र देऊन सुद्धा या ठिकाणी टीसी बसवण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याने गेल्या महिन्याभरापासून खेमेवाडीत पाणीपुरवठा बंद आहे. लोक शेतातील पाणी वापरत आहेत त्यामुळे अनेक रोगांना निमंत्रण दिल्यासारखे आहे. तसेच ग्रामपंचायतीकरडून आठ किंवा दहा दिवसांनी एकदा टँकर येत आहे. पाण्याविना महिलांचे मोठे त्रास होत आहेत. तसेच आता चुकीचा हंगाम सुरू झाल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने महिला आता आक्रमक झालेल्या आहेत.
Trending
- राणेंच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदय भोसले मैदानात !
- वेंगुर्ल्यातील शेकडो युवकांचा भाजपमध्ये प्रवेश
- नारायण राणे अडीच लाखाच्या मताधिक्क्याने निवडून येणार – विशाल परब
- द्वेषपूर्ण भाषणे करण्याऐवजी सरकारच्या कामगिरीवर मते मागा : काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे
- “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
- प्रतापसिंह राणे आताही भाजपबरोबरच!
- अमित शहा यांची उद्या म्हापशात जाहीर सभा
- दाबोळीबाबत विरोधकांच्या अफवांना बळी पडू नका