चांगल्या राजकीय नेत्याचे लक्षण नसल्याचे संजय राऊत यांची टिका
Sanjay Raut- PM Narendra Modi रशिया- युक्रेन (Rassia- Uckren) युद्धात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्यस्थी केली पण महाराष्ट्र- कर्नाटक सीमा प्रश्नाकडे (Maharashtra- Karnatak border dispute ) जाणिवपुर्वक दुर्लक्ष केले असल्याची टिका शिवसेना ठाकरे गटाने (Shivsena- UBT) नेते आणि खासदार संजय राउत यांनी पंतप्रधानांवर सामना (Samna) या वृत्तपत्रातील रोकठोक या स्तंभातून केली.
आपल्या लेखात लिहतान संजय राउत म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया- युक्रेन युद्धात मध्यस्थी करतात पण महाराष्ट्र-कर्नाटक सीमा वादाकडे पुर्णपणे डोळेझाक करतात. हे एका चांगल्या राजकारण्याचे लक्षण नक्कीच नाही,” असे बोलून महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद हा दोन राज्यातील जनता आणि सरकारमधील लढा नसून मानवतेचा संघर्ष असल्याचेही राऊत म्हणाले. तसेच “राज्यांच्या पुनर्रचनेत त्यांच्या इच्छेविरुद्ध कर्नाटकात समाविष्ट झालेल्या बेळगाव आणि आसपासच्या भागातील मराठी भाषिक लोकांचा संघर्ष क्रूरपणे चिरडला जाऊ शकत नाही,” असेही राज्यसभा खासदार राउत यांनी म्हटले आहे.