प्रतिनिधी /बेळगाव
खानापूर येथील भाजप समस्या परिहार केंद्रातर्फे डॉ. सोनाली सरनोबत यांनी आशा व अंगणवाडी कार्यकर्त्या तसेच साहाय्यिका यांच्यासाठी पोस्टल विमा योजना लागू केली आहे. यावेळी डॉ. सरनोबत म्हणाल्या, आशा, अंगणवाडी कार्यकर्त्या व साहाय्यिका जंगलात जाऊन चाळण झालेल्या रस्त्यांवरून तसेच खराब हवामानामध्ये दुर्गम भागात जाऊन अखंड काम करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेवेची दखल घेऊन ही योजना लागू केली आहे. विम्याची रक्कम नियती फौंडेशनतर्फे भरण्यात येणार आहे.
याप्रसंगी पोस्टमन ज्ञानेश्वर गुरव, राजू मुतगी, विश्वनाथ गुंजीकर यांनी ऑनलाईन दाखल करून घेण्यासाठी मदत केली. याप्रसंगी माउली शाळेचे मुख्याध्यापक सुनील चिगुळकर तसेच अर्जुन, अनंत व संदीप गावडे, सचिन पवार, राजू मादार आदी उपस्थित होते.