अध्याय चोविसावा
सकाम म्हणजे मनात काही एक फळाची अपेक्षा ठेऊन कर्म करणाऱया माणसाला त्या कर्माचे फळ भोगावेच लागते. पुण्य कर्माचे फळ स्वर्गात मिळते तर पाप कर्माचे फळ भोगण्यासाठी नरकवास पत्करावा लागतो. पाप पुण्याची फळे भोगून झाल्यावर त्याचा पुढील जन्मी करावयाच्या कर्मानुसार पृथ्वी किंवा पाताळ लोकात पुनर्जन्म होतो.
याचाच अर्थ मागील जन्मी जे पाप पुण्य केले असेल त्याच्या फलस्वरूप पुढील जन्म मिळत नसून मागील जन्मीच्या अपूर्ण राहिलेल्या वासनांच्या पूर्तीसाठी अनुरूप अशा योनीत पुनर्जन्म होतो. जो मनुष्य मनात कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्म करत असतो त्याला ही खात्री असते की, तो कर्ता नसून ईश्वर कर्ता आहे आणि तो त्याच्याकडून त्याला हवे असलेले कर्म करून घेत आहे. त्यामुळे त्या कर्माच्या पूर्ण, अपूर्णतेची जबाबदारी त्याच्यावरच आहे. एकदा हा दृढनिश्चय झाला की, ते कर्म करण्यातून अपेक्षा बाळगणे तो बंद करतो. साहजिकच त्या कर्माच्या फळातून म्हणजे ते कर्म करण्यापासून निर्माण होणाऱया पाप पुण्यातून तो मोकळा होतो. त्यामुळे त्याला पाप पुण्य भोगण्यासाठी स्वर्ग किंवा नरकात वास करावा लागत नाही, तसेच त्याने अपेक्षारहित कर्मे केलेली असल्याने त्याच्या कोणत्याही वासना किंवा इच्छा अपुऱया राहिल्या नसल्याने त्याचा पुनर्जन्म होत नाही. त्यामुळे तो त्रैलोक्मयाच्या बंधनातून सुटून त्रैलोक्मयाच्यापुढे जाऊ शकतो.
थोडक्मयात पुढील लोकात प्रवेश करून वैकुंठाला गवसणी घालण्यासाठी माणसाने निरपेक्षतेने वाटय़ाला आलेलं कर्म करावं तसेच आयुष्यात जे जे घडतंय ते ते ईश्वरी इच्छेनुसार घडतंय आणि ते आपल्या हिताचं आहे, याची खात्री बाळगून ईश्वर स्मरणात आयुष्य घालवावं. हे वाचताना सहज सोपं वाटतं पण प्रत्यक्षात तसं जगणं हे एक आव्हान असतं कारण मनुष्य स्वतःला कर्ता समजत असल्याने तो सतत स्वतःच्या मनासारखं व्हावं म्हणून धडपडत असतो. त्यासाठी चांगली वाईट कर्मे करतो आणि पाप पुण्याच्या जाळय़ात फसतो. तसेच अपूर्ण इच्छा पूर्ण करण्यासाठी पुनर्जन्म घेतो पण जो मनुष्य ईश्वराचं आव्हान स्वीकारून त्याप्रमाणे जगतो त्याला त्रैलोक्मयाच्या पुढील लोकात प्रवेश मिळतो. त्रैलोक्मयाच्या पुढेही अनेक लोक आहेत त्या पुढील लोकांचं वर्णन भगवंत उद्धवाला सांगत आहेत ते आपण पाहू. भगवंत म्हणाले, ह्या त्रैलोक्मयाच्या बाहेर एक लक्ष योजने अंतरावर भक्तवत्सल श्रीहरीने आपल्या कृपेने ध्रुवमंडळ निर्माण केले आहे.
त्रैलोक्मयात प्रलयकाळ झाला तरी ध्रुवाला कधीही आपल्या स्थानापासून ढळावे लागत नाही. तो सदोदित अचलच असतो. म्हणून ध्रुवपद अढळ आहे असे म्हणतात. पृथ्वीपासून एक कोटी योजने अंतरावर महर्लोक आहे हे लक्षात ठेव, तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणारे लोक राहतात. तेच त्यांचे वसतीस्थान होय. तेथून वर एक कोटी योजनेअंतरावर जनोलोक आहे. तेथे जितेंद्रिय व महायोगी असे सनकादिक राहतात. तेथून पुढे दोन कोटी योजने अंतरावर तपोलोक तपस्वी वैराजदेव हेच तेथील खरोखर रहिवासी होत. तपोलोकाहुन वर चार कोटी योजने प्रदेश आहे, तेथे सत्यलोक आहे. तेथील अधिपती ब्रह्मदेव आहे. तेथे चारही वेद आणि सर्व धर्म मूर्तीमंत आहेत, शुद्ध ब्रह्मचर्य मूर्तीमंत आहे आणि प्रत्यक्ष तपही मूर्तीमंत असते, त्या ब्रह्मसदनी प्रत्यक्ष गायत्री मूर्तीमंत असते, वाणी मूर्तीमंत असते, दया मूर्तीमंत नांदते आणि योगही मूर्तीमंत असतो. दक्षिणाग्नि, गार्हपत्य व आहवनीय असे जे तीन अग्नी, ते तेथे मूर्तीमंत असतात. सत्यलोकामध्ये सत्य मूर्तीमंत असते. तेथे असत्य असतंच नाही. तेथे राहणारे लोक कोण ते सांगतो. गायत्रीमंत्राचा जप करणारे, वेद शास्त्र संपन्न ब्राह्मणांचा आदर करणारे आणि जे यज्ञयागांचे निष्काम उपासक असतात, ते तेथे राहतात. सत्यलोकापर्यंत पोहोचणारे लोक ब्राह्मणांच्या कार्याकरिता मृत्यु पत्करणारे, गोरक्षणाकरिता प्राण देणारे, परोपकार करता करता स्वतः दरिद्री होणारे असतात. थोडक्मयात संपूर्ण निस्वार्थतेनं सत्कर्मात आयुष्य घालवणारे लोक सत्यलोकात राहतात असं म्हणता येईल.
क्रमशः