कोल्हापूर प्रतिनिधी
भाजपची नवी विचारधारा आहे.यातून सामाजिक आणि व्यक्तिगत विकास करत आहे. जनधन योजनेतून सामन्याचा विकास केला जात आहे. कोविड मध्ये 220 करोड मोफत टीकाकरण केलं, असं कुठल्याच देशात झालं नाही असं वक्तव्य केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांनी केलंआहे.आज ते कोल्हापूर दौऱ्यावर आले आहेत. त्यावेळी ते पत्रकार परिषदेत कोल्हापूरात बोलत होते.
आमची विचार धारा वसुदेव कुटुंब कम आहे. भाजपने 3 करोड आवास योजना राबवली. शेतकऱ्यांना 75 व्या वर्षात पहिल्यादाचं शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हजार थेट दिले. तर आरोग्यासाठी आयुष्यमान 5 लाख रुपयांचा विमा आणि महिलांसाठी 9 करोड 60 लाख महिलांना उज्वला गॅस दिला. विमान क्षेत्रात मागील 68 वर्षात 74 विमानतळ होते , मात्र या 9 वर्षात आणखीन 74 वाढवले. रोड ट्रेनपोर्ट मध्ये आज 300 टक्के वाढ झाली आहे. 30 वर्षात शिक्षण प्रणालीत परिवर्तन झालं नाही मात्र आम्ही नवीन पद्धती सुरू केल्या आहेत. तसेच प्रधान मंत्री योजनेत 1 कोटी 37 लाख लोकांना रोजगार संधी उपलब्ध केली. तर कोल्हापूर क्षेत्रातही आणखीन विमानतळ विकसित करणार असल्याचं त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे.
कुस्ती पटू आंदोलनाबाबत सिंधीया यांना विचारले असता त्यावर न्यायालय निर्णय घेईल असे ते म्हणाले आहेत. सध्या देशात 8 वर्षात एअर फोर्स, आर्मी, नेव्ही मध्ये प्रगती केली आहे.आधुनिक तंत्रज्ञान आणले आहे. देशाच्या सुरक्षेत कोणत्याही प्रकारची तडजोड नाही. असे सिंधिया म्हणाले आहेत.