Ashish Deshmukh News : काँग्रेसचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.विदर्भाच्या हितासाठी हा प्रवेश असल्याचं देशमुखांनी सांगितलं. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाला. पक्षप्रवेशानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देशमुखांचे तोंडभरुन कौतुक केले.
यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, ज्याला राजकारणाची समज आहे ते आशिष देशमुख भाजपमध्ये परत आलेत त्यांचे मनापासून स्वागत. ज्यावेळी राहुल गांधी यांनी ओबीसी समाजाचं अवमान केलं आणि कोर्टात क्षमा मागायला नकार दिला. यावेळी आशिष देशमुख यांनी स्पष्टपणे भूमिका मांडली. यानंतर चंद्रशेखर बावनकुळे आणि मी देशमुखांना परत आणायचं ठरवलं. याच्या मागचं खरं कारण म्हणजे ते कलाकार असल्याचेही ते म्हणाले. जंगलातील कितीही जनावरं एकत्र आले तर ते वाघाची शिकार करू शकणार नाही. मोदीजी वाघ आहेत. 2024 मध्ये मोदी हे जादा जागा घेऊन निवडून येतील असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले की,आशिष देशमुख यांनी 2009 साली सावनेरमध्ये निवडणूक लढवली.आशिष देशमुकांनी सुनील केदार यांच्या तोंडचं पाणी पळवलं.पुढची निवडणूक लढणार नाही हे सांगायला हिंमत लागते असं कौतुक फडणवीसांनी केले.श्रध्दा आणि सबुरी लक्षात ठेवून देशमुख भाजपमध्ये आले.देशमुख 2024 ची निवडणूक लढवणार नाहीत.आता भाजप हाच देशमुखांचा शेवटचा पक्ष असेल असेही फडणवीस म्हणाले. भाजप परिवार खुल्या मनाने देशमुखांना स्वीकारेल असेही ते म्हणाले.