प्रतिनिधी / कोल्हापूर
अतिवृष्टीमुळे जिल्हय़ातील जनजीवन अस्ताव्यस्त झाले आहे.गोर-गरीब,कष्टकरी महिलांना संसार चालवणे कठीण झाले आहे.अशातच महिला बचत गटांनी मायक्रो फायनान्स कंपन्याकडून काढलेल्या कर्जासाठी कंपन्यांनी प्रचंड तगादा लावला आहे.महिलांना जगणेही मुश्किल झाले आहे.यामुळे मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून होणाऱया छळामुळे महिलांनी आत्महत्या करण्यापूर्वी ही कर्जे माफ करावीत अशी मागणी रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडियाने केली आहे. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
टाऊन हॉल येथून या मोर्चाला सुरुवात झाली.सीपीआर,दसरा चौक,व्हीनस कॉर्नर,बसंत बहार रोड मार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आला.याठिकाणी मोर्चाचे रुपांतर सभेत झाले.यावेळी मायक्रो फायनान्स कंपन्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले.यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे,मायक्रो फायनान्या कंपनीच्या वसुली एजंटांनी कर्ज परताव्यासाठीच्या आचार संहितेचे पालन करावे , अन्यायी , अरेरावी , महिलांचे शोषण , छळ करणाऱया एजंटांवर कारवाई करावी, महिलांच्या घरात घुसून प्रापंचिक साहित्य हिरावुन घेतले जात आहे. यामुळे महिलांना त्रास देणाऱया कंपन्यांवर कारवाई करुन मायक्रो फायनान्स कंपन्यांची कर्जे माफ करावीत.
या मोर्चात रूपा वायदंडे, प्रा . शहाजी कांबळे अध्यक्ष ,उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, कुमार कांबळे, संजय जिरगे,दिलीप कोथळीकर, बाजीराव जैताळकर रुपाली कांबळे,पुष्पा नलवडे,मुमताज नदाफ,माधुरी कोरे,सविता चौगुले,नंदाताई भास्कर,सुरेखा पाटील, सविता चौगुले, माधुरी कुंभार,राजश्री तेली यांच्यासह महिला मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.