’कॅन्सर’ या रोगाविषयी सामान्य जनतेत प्रचंड भीती पसरली आहे. कॅन्सरवर उपचारच नाहीत अशी भावना त्यांनी मनात तयार करून घेतली आहे. कॅन्सरमुळे नाही तर त्याच्या भीतीमुळे मोठय़ा संख्येने नागरिक दगावताना दिसतात…
आपल्या शरीराचा कुठला एखादा भाग कॅन्सरने व्यापला आहे, असे माहीत असूनही डॉक्टरांना तर दाखवत नाहीच. मात्र ते कुणाशीच त्याविषयी चर्चा करत नाहीत. महिलावर्गात कॅन्सरविषयी खूप भीती असते. त्यांना हा आजार जडला तरी ते त्याची वाच्यता कुणाकडे करत नाहीत. शरीराच्या एखाद्या भागात गाठ आढळून आल्यास रूग्ण डॉक्टरांकडे जातो. परंतु तेव्हा वेळ निघून गेलेली असते. कारण कॅन्सर अंतिम टप्प्यात पोहोचलेला असतो.
कॅन्सर किंवा कर्करोग अतिशय गंभीर स्वरुपाचा आजार आहे. यातल्या कर्करोगाच्या काही प्रकारावर अजूनही उपाय शोधले जात आहेत. कर्करोग नेमका कोणाला होऊ शकतो हे ठामपणे सांगता येत नाही. पण काही कारणे अशी आहेत ज्यामुळे कॅन्सर होण्याचा धोका अधिक आहे. यातले पहिले कारण म्हणजे तंबाखू किंवा सिगारेट. वारंवार आपण कर्करोगाच्या जनजागृतीसाठी करण्यात आलेल्या जाहिराती पाहतो. यात या प्रमुख दोन कारणामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असे सांगतात पण या व्यतिरिक्तही अनेक कारणे आहेत. जंकफूड, सतत चुकीचा आहार, बदलती जीवनशैली, प्रदूषण यासारख्या गोष्टी देखील कर्करोगाला कारणीभूत आहेत.
खरे तर तंबाखूजन्य पदार्थानंतर कर्करोग होण्यामागे बदलती जीवनशैली देखील कारणीभूत असल्याचा निष्कर्ष संशोधनातून समोर आला आहे आणि ते खरेही आहे म्हणा. घडय़ाळय़ाच्या काटय़ांवर चालणारे धाकाधकीचे जीवन, त्यातून सकस आहार न मिळणे, ताण तणाव अशा अनेक गोष्टी हळूहळू आपल्याला कर्करोगाच्या दरीत ढकलत असतात. हल्ली आपण इतके व्यस्त होतो की आरोग्याची काळजी घ्यायला देखील आपल्याकडे वेळ नसतो. त्यातून या कर्करोगाबद्दल दुर्दैवी बाब म्हणजे या रोगाचे निदान व्हायला उशीर लागतो.
बऱयाच रुग्णाच्या बाबतीत कर्करोगाच्या दुसऱया किंवा तिसऱया टप्प्यात या रोगाचे निदान झाल्याचे देखील समजते. काही वेळा योग्य ते उपचार करून रुग्ण यातून बरा होता. पण काहींच्या नशीबी मात्र मरण असते. पण कर्करोगाची काही लक्षणे आहेत जी लक्षणे तुम्हाला आढळली तर याचे योग्य वेळी निदान करून त्यावर वेळीच उपाय करू शकता.
कॅन्सरचे निदान होण्यासाठी आधी बायोप्सी केली जाते. यात शरीरात झालेल्या गाठमधील मांसाचा छोटा तुकडा काढला जातो. त्याचे परीक्षण केले जाते. याला वृद्यकीय संज्ञेत बायोप्सी म्हटले जाते. जर गाठ लहान असेल तर पूर्ण गाठ काढली जाते. कॅन्सरचे निदान झाल्यावर त्यावर उपचार सुरू करण्यात येतो. त्यात सगळय़ात महत्त्वाची व प्रमुख म्हणजे किमोथेरपी होय.
कर्करोगाची लक्षणे
? स्तनात किंवा शरीरातील काही भागत गाठी तयार होणे
? खोकला किंवा सतत घसा दुखणे
? दीर्घ काळापासूनचे दुखणे
? तोंडातली बरी न होणारी जखम
? अन्न गिळताना त्रास होणे
? अचानक आवाजात बदल होणे
? लघवी किंवा मलातून रक्तस्त्राव होणे
? वारंवार चक्कर येणे किंवा भूक न लागणे
? वजनात अचानक घट होणे
ही लक्षणे अगदी सामान्य असून, तज्ञ डॉक्टरांना दाखवून निदान करून घेणे आवश्यक आहे