ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
सध्याच्या परिस्थितीत केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी – बारावीच्या परीक्षा घेणे कठीण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे उत्तीर्ण करा अशी शिफारस दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांना केली आहे.
ते म्हणाले, सीबीएसईच्या परीक्षा घेणे अशक्य आहे त्यामुळे नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावी – बारावीच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करा. त्याचप्रमाणे पुढील शैक्षणिक वर्षासाठी सीबीएसई आणि एनसीईआरटीच्या अभ्यासक्रमात 30 टक्के कपात करण्यात यावी. तसेच जेईई, नीट यासारख्या प्रवेश परीक्षांच्या अभ्यासक्रमातह कपात करण्यात यावी अशी सूचना सिसोदिया यांनी केली आहे.
त्याचबरोबर दिल्लीतील सर्व विद्यार्थ्यांना शिकवणे सोपे व्हावे यासाठी शिक्षकांना दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओच्या एफएम चैनल वर दररोज तीन तास उपलब्ध करून द्यावेत अशी मागणीही सिसोदिया यांनी यावेळी केली आहे.