बेंगळूर/प्रतिनिधी
गेल्या वर्षीच्या तुलनेत कर्नाटक एसएसएलसी परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी झाली आहे, असे असतानाही केएसईईबीने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आल्याचा बोर्डाला अभिमान आहे. कारण कोरोना महामारी (साथीचा रोग) असूनही कर्नाटक बोर्ड परीक्षा घेतलेल्या अशा काही राज्यांपैकी एक आहे.
या वर्षाची परीक्षा केवळ विद्यार्थ्यांसाठीच नव्हे तर सरकार आणि मंडळासाठीदेखील एक कठीण काम होते. परीक्षेचे पावित्र्य व गोपनीयता राखण्याव्यतिरिक्त पालकांचा आत्मविश्वास जिंकणे आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेणे एक आव्हान होते, असे कर्नाटक बोर्डाने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे.