रमेश गोरल यांचे जिल्हाधिकाऱयांना पत्र
बेळगाव :
गल्लीत मंदिरच नाही अशा गणेशोत्सव मंडळांची संख्या मोठी आहे. अशा मंडळांसमोर गणेशोत्सव कसा साजरा करावा, असा प्रश्न निर्माण झाला असून त्यांना लहान मंडप उभारण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्य रमेश गोरल यांनी केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना पत्र लिहून त्यांनी मागणी केली आहे.
कोरोना काळात शासनाने नियमावलीनुसार सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यास परवानगी दिली आहे. ज्या गणेश मंडळांच्या परिसरात जवळपास कोणतेच मंदिर नाही किंवा सभागृह नाही, जागा अपुरी आहे, अशा गणेश मंडळांना लहान मंडप घालायला परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
बेळगाव शहरासह तालुक्मयातील अनेक गणेश मंडळे आपल्याकडे समस्या मांडत आहेत. आपण शासनाचे सर्व नियम पाळत गणेशोत्सव साजरा करू, असे त्यांचे म्हणणे आहे. कोविड काळात शासनाची नियमावली पाळण्यास मंडळे तयार आहेत. मात्र नियमावलीतील काही जाचक अटी शिथिल कराव्यात. कोरोनाला रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे कार्य सुरू आहे ते कौतुकास्पद आहे, असेही गोरल यांनी जिल्हाधिकाऱयांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे..