वार्ताहर/ शिरगुप्पी
गतवषी नद्यांना आलेला महापूर तर यंदाच्या वर्षात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेती व्यवसायच धोक्मयात आल्याने शेतकऱयांचे आर्थिकदृष्टय़ा कंबरडेच मोडले आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादकांच्या पाठबळावर कार्यरत असलेल्या साखर कारखान्यांनी यंदाच्या गाळप हंगामातील उसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देऊन भयावह संकटप्रसंगी शेतकरीवर्गाची अर्थिक उन्नती साधण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन ऊस उत्पादक संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार मोहन शहा यांनी पत्रकारांशी बोलताना केले.
शहा पुढे म्हणाले, गतवषी नद्यांना आलेल्या महापुराच्या पाण्यामुळे कृष्णाकाठावरील ऊसपिकांची नासाडी झाली. तसेच अतिव पावसामुळे ऊस उत्पादनात घट आल्याने ऊस उत्पादकांना मोठा आर्थिक फटका बसला. या बिकट परिस्थीतीचा सामना करीत असताना यंदाच्या पावसाळय़ात अतिवृष्टीने धुमाकाळ घातला आहे. या अतिवृष्टीचा फटका सर्वत्रच बसल्याने उसाव्यतिरिक्त घेत असलेल्या खरीप पिकांचे मोठे नुकसान होऊन शेतकरीवर्ग या नैसर्गीक आपत्तीजनक परिस्थितीमुळे संपूर्णतः आर्थिकदृष्टय़ा खचला गेला आहे.
मजुरी, खतांचे दर वाढतेच
गेल्या दोन वर्षात पावसाच्या तडाख्याने निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे ऊस उत्पादनात घट तसेच रासायनिकसह इतर खतांचे वाढत्या दराचे संकट, वाढलेली मजुरी, शेतीमशागतीसाठी लागत असलेला मोठा खर्च या सर्व बाबींचा विचार केला असता नगदी पीक म्हणून घेत असलेली ऊसशेती संकटात सापडली आहे. मात्र ऊस उत्पादकांच्या पाठबळावर साखर कारखाने मात्र अर्थिक उन्नती साधण्यात अग्रेसर ठरत आहेत.
14 दिवसाच्या आत ऊसबिले जमा करा
सध्या ऊस उत्पादकवर्ग कर्ज व व्याजाच्या विळख्यात सापडला आहे. या आर्थिक संकटातून सावरण्यासाठी उसाला एफआरपीपेक्षा अधिक वाजवी दर मिळण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीचा अभ्यास करून आर्थिकदृष्टय़ा प्रगती साधण्यासाठी ऊस उत्पादकांना केंद्रबिंदू मानणाऱया साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा अधिक दर जाहीर करून ऊस पुरवठा करणाऱया शेतकऱयांना चौदा दिवसाच्या आत ऊसबिले द्यावीत. तरच बळीराजा आर्थिक संकटातून शेतकरी सावरेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले.