सुगीसाठी बळीराजा धडपडतोय
आण्णाप्पा पाटील/ बहाद्दरवाडी
तालुक्मयात सुगी हंगामाची लगबग सुरू झाली आहे. तालुक्मयाच्या सर्रास भागातील भातपीक कापणीसाठी आले असल्यामुळे शिवारात बळीराजाची एकच धांदल दिसून येत आहे. भातकापणी, भात उडवे बनविणे, तसेच मळणी आदी कामात बळिराजा व्यस्त असतानाचे चित्र पहावयास मिळत आहे. सुगी हंगाम साधण्यासाठी शेतकरी धडपडू लागला आहे. मात्र, शेतमजुरांची कमतरता निर्माण झाली आहे.
शनिवारपासून दिवाळीच्या सणाला प्रारंभ होणार आहे. गुरुवारी सायंकाळी तालुक्मयाच्या काही भागातील शेतकऱयांनी वसुबारस निमित्त घरातील गाई व वासरांचे पूजन केले आहे. सर्वांना दिवाळीची चाहूल लागली आहे. अवघ्या एक दिवसावर दिवाळी येऊन ठेपली असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. बळिराजाला मात्र यंदा शिवारातच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. कारण परतीच्या पावसाने व ढगाळ वातावरणामुळे सुगी हंगाम लांबणीवर पडला होता. यामुळे दिवाळीच्या सणातही सुगी हंगाम साधून घेण्यावर शेतकरी भर देणार आहेत.
गेल्या पंधरा दिवसांपूर्वी तालुक्मयात परतीच्या पावसाने हजेरी लावली होती. यामुळे शेतात पाणी साचले आहे. बहुतांशी शिवारातील भातपिकही पावसामुळे आडवे झाले आहे. यामुळे भातपिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. मध्यंतरी झालेल्या संततधार पावसामुळेही शेतशिवारात मोठय़ा प्रमाणात पाणी साचले होते. यातून व परतीच्या पावसातून जी भातपिके शिल्लक राहिलेली आहेत, त्याची कापणी सध्या जोमाने सुरू आहे.
तालुक्मयात बासमती, इंद्रायणी, दोडगा, सोना मसुरी, शुभांगी, सुपर सोना, इंटाण, 312 व इतर नवीन जातीची भातपिके आहेत. एकाच वेळेला साऱया शेतकऱयांना सुगी करण्यासाठी शिवारात जावे लागत असल्यामुळे मजुरांची टंचाई निर्माण झाली आहे. तालुक्मयाच्या मच्छे, पिरनवाडी, नावगे, काकती, होनगा आदी भागात औद्योगिक वसाहतींची वाढ झाली आहे. यामुळे ग्रामीण भागातीलही काही महिला कारखान्यामध्ये जाऊ लागल्या आहेत. तर काही महिला रोहयो कामांसाठी जात असल्यामुळे पूर्वीच्या तुलनेत सध्या शिवारात काम करण्यासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे.
मजुरांची कमतरता जाणवू लागल्यामुळे काही शेतकरी आपापसात मिळी करून सुगीची कामे करताना दिसत आहेत. सध्या शाळांना सुटी असल्यामुळे घरातील विद्यार्थीवर्गही आई-वडिलांना सुगीसाठी मदत करताना दिसत आहे. पश्चिम भागात भातकापणी व मळणीसाठी महिलांना एका दिवसाला 200 रुपये तर पुरुषांना 300 रुपये इतकी मजुरी देण्यात येत आहे. पूर्वी भातकापणी व मळणीसाठी येणाऱया मजुरांना मळणी झाल्यानंतर मजुरीच्या स्वरुपात भातच देण्यात येत होते. मात्र अलीकडे ही मजुरी रक्कम स्वरुपात देण्यात येऊ लागली आहे. तर काही मजूर भाताचीही मागणी करतात.
ग्रामीण भागातही आधुनिक पद्धतीने शेती करण्यावर भर देण्यात येऊ लागला आहे. मजुरांची टंचाई निर्माण झाली असल्यामुळे काही शेतकरी मशिनच्या साहाय्यानेही भातकापणी करीत आहेत. भातकापणीसाठी या मशीनला प्रतितासाला 500 ते 600 असे भाडे देण्यात येत आहे. परतीचा पाऊस झाला असल्यामुळे बहुतांशी शिवारात सध्या पाणी दिसून येत आहे. यामुळे शेतात चरी काढून पाणी काढण्यात येत आहे. मात्र, पाणी असल्यामुळे चिखलात भातकापणी करताना शेतकऱयांचे हाल होऊ लागले आहेत.
उडवे घालण्याचे काम जोमात
भातकापणी करून भात उडवे घालण्यात येऊ लागले आहेत. भात उडवे ही एक शेतकऱयांमधील असलेली कला आहे. कारण भात उडवे घातल्यानंतर त्यामध्ये आत पाणीही जाणार नाही, अशा पद्धतीने हे उडवे घालण्यात येतात. काही शेतकरी मळणीही करताना दिसत आहेत. सध्या अधिकतर ट्रक्टरच्या साहाय्यानेच मळणी करण्यात येऊ लागली आहे. तसेच भात वारे देण्यासाठीही मशीनचा वापर करण्यात येत आहे.
कडधान्ये पेरणी कामालाही प्रारंभ
या सुगी हंगामात भातकापणी व मळणीसह रताळी काढणी व ऊसतोडणी आदी कामेही जोमाने सुरू आहेत. भातकापणी केलेल्या शिवारात कडधान्ये पेरणी करण्यात येऊ लागली आहे. सध्या बासमती भाताला 2400 ते 2500 प्रतिक्विंटल इतका दर आहे. हा दर शेतकऱयांना परवडणारा नाही. त्यामुळे बेळगावच्या बासमती भावाला योग्य हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे. गेल्या वषी बासमती भाताला प्रारंभीच्या काळातच 3000 ते 3200 प्रतिक्विंटल असा दर होता. तर शेवटच्या टप्प्यात 4000 रुपये प्रतिक्विंटल दर होता.
बऱयाच हॉटेलमध्ये दिल्ली राईसचा वापर करण्यात येत आहे. बेळगावच्या बासमती तांदळाचीही चव चांगली आहे. हॉटेल मालकांनी दिल्ली राईस ऐवजी बेळगावचा बासमती तांदूळ वापरल्यास इथल्या स्थानिक शेतकऱयांना हातभार लागू शकतो. त्यामुळे शेतकऱयांचा विचारही करण्यात यावा.
हमीभाव देण्याची मागणी
सध्या भाताला कमी प्रमाणात दर मिळत आहे. हा दर शेतकऱयांना परवडणारा नाही. उत्पादनासाठी केलेला खर्च पाहता भाताला योग्य हमीभाव मिळावा, अशी मागणी शेतकरीवर्गातून होत आहे.