वार्ताहर/ हुबळी
केंद्र सरकार पहिल्यापासूनच शेतकऱयांच्या बाजूने असून त्यांच्या समस्यांबाबत मुक्तपणे चर्चा करण्यात तयार आहे. त्यामुळे शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन छेडू नये, अशी मागणी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी केली. कृषी दुरुस्ती कायद्याला विरोध दर्शवून 8 डिसेंबर रोजी पुकारलेल्या भारत बंदवर ते प्रतिक्रिया देत होते.
यापूर्वीच लोकसभेत आम्ही शेतकऱयांना स्पष्टपणे भरवसा दिला आहे. दुरुस्ती कायद्यामध्ये कोणता तरी गोंधळ असल्याच तो दूर करण्यास तयार आहे. त्यामुळे शेतकऱयांनी आपले आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले. काँग्रेसला पाठिंबा देऊन आम्ही चुकीचा निर्णय घेतला होता, असे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी सांगितले होते. यावर प्रतिक्रिया देताना मंत्री प्रल्हाद जोशी यांनी, काँग्रेस धोकेबाज असल्याचे कुमारस्वामींना आता कळले आहे. तसेच पुढील दिवसात कोणते निर्णय घ्यावेत, याचा त्यांनी विचार करावा, असे त्यांनी सांगितले.