स्थानिक आघाड्यांही महत्वाच्या, साके ग्रामपंचायतीसाठी पॅनल मोर्चेबांधनी सुरू
व्हनाळी / सागर लोहार
कागल तालुक्यात सुमारे 53 ग्रामपंचायतींच्या निवडणूकीचा निवडणूक कार्यक्रम जाहिर झाला अनं गावागावात सोयीस्कर युतीच्या पॅनल जुळवाजुळवीसाठी चर्चांना उत आला असल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. राज्यातील महाआघाडी पॅटर्न आता गल्लीत ही पहायला मिळत असून स्थानिक पातळीवर आघाड्यांनाही मोठे महत्व आहे साके ता. कागल येथे ग्रामपंचायतीमध्ये गेल्या पंचवार्षिक निवडणूकीत सरपंच पदासाठी जनरल पुरूष आरक्षण पडले होते. शिवाय महाविकास आघाडी विरोधात मंत्री हसन मुश्रीफ यांचे कार्यकर्ते बाळासाहेब तुरंबे गट अशी चुरस होवून महाविकास आघाडीला यश आले. त्यामध्ये माजी आमदार संजय घाटगे, खा. संजय मंडलिक,राजे समरजितसिंह घाटगे या गटातील सदस्यांचा समावेश होता.
यंदा पंचवार्षीक निवडणूकीत आद्याप सरपंच पदाचे आरक्षण सोडत झाली नाही तरी देखील गावात गटातटाच्या राजकारणाला सुरूवात झाली आसून गावात सुरूवातीपासून माजी आम. संजयबाबा घाटगे यांचा प्रबळ गट असून त्याबरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांचा देखील मोठा गट आहे. शिवाय खासदार संजय मंडलिक, राजे समरजितसिंह घाटगे यांचा गटही सक्षम आहे. त्यामुळे सर्वच गटनेत्यांनी स्वतंत्र आपल्या गटाचे ग्रामपंचायतीवर वर्चस्व कसे होईल याकडे गेल्या वर्षभरापासून लक्ष केंद्रीत केले आहे. सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीत अवलंबुन असलेल्या नेत्यांना आता पॅनलसाठी जुळवाजुळव करावी लागत आहे. शिवाय राजकारणात राज्यातील महाविकास आघाडी विरोध भाजपा असा पॅटर्न राहिल्यास दुरंगी लढत होईल न पेक्षा प्रत्येक पक्षाचे स्वतंत्र पॅनेल उभारल्यास लढत चैारंगी होण्याची शक्यता दिसत आहे. गावातील मागील 5 वर्षात विकासाचा आढावा घेतल्यास महाविकास आघाडीने परिपुर्ण असा विकास केला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे विकासाचा जाहिरनामा फक्त अश्वासनावरच गेल्याची चर्चा आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत विकासकामे करणाऱ्यांनाच प्राधान्य देण्याचे नागरिकातून बोलले जात आहे. पण या सर्वांत ज्या अपक्ष उमेदवारांनी गत निवडणूकीतून अर्ज माघारी घेतले त्यांना दिलेल्या आश्वासनांच काय म्हणून यंदाच्या निवडणूकीत आपक्षांना शब्द देवून थांबवणे हे गावपुढा-यांना दमछाक होणारे ठरणार आहे.
सरपंच पदासाठी कोणते आरक्षण येईल याकडे गटनेते लक्ष ठेवून बसले आहेत. ज्या गटाकडे सर्व समाजातील उमेदवार उपलब्ध आहेत त्यांचाच यामध्ये टिकाव लागणार असून फक्त जनरल उमेदवार असणाऱ्या गटाची मात्र तारेवरली कसरत सुरू आहे. गावात गेल्या पाचवर्षाच्या काळात विकास रखडा होता. मंत्री हसन मुश्रीफ यांनी साके गावात रस्ते विकास कामांचा धडाकाच चालू केल्याने ग्रामपंचायत सत्ता स्थापनेसाठी विकासकामाच्या जोरावर मते मागण्यास मुश्रीफ गटाला मार्ग मोकळा झाला आहे. तसेच गावात महाविकास आघाडी नेत्यांचे आदेश पाळल्यास राजे गटाला स्वतंत्र लढावे लागणार आहे. काही गटनेत्यांनी एकत्र लढण्याविषयी एकमेकांना आपला प्रस्ताव कळवला असला तरी अद्याप कोणत्याही गटाशी एकमेकांशी अधिकृत युती जाहिर झालेली नाही त्यामुळे निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विकासकामांच्या पुर्ततेसाठी माजी आमदार संजयबाबा घाटगे व मंत्री हसन मुश्रीफ यांच्या गटनेत्यांनी एकत्रित निवडणूक लढविल्यास गावचा विकास होण्यास मदत होईल असी लोकभावना व्यक्त होत आहे.
सत्ता नसातानाही 5 कोटीची विकासकामे..
साके ग्रामपंचायतीमध्ये मुश्रीफ गटाची सत्ता नाही परंतू गावचा सर्वांगिन विकास होण्यासाठी स्थानिक गटनेत्यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्री मुश्रीफांनी निधी उपलब्ध करून दिला. त्यातून गावात सुमारे 5 कोटीची विकासकामे पुर्णत्वास आली आहेत. त्यामुळे सत्ता नसतानाही गावात विकासकामे केल्यामुळे मंत्री मुश्रीफांचे नागरिकातून कैातुक होत आहे.