जिल्हाधिकाऱयांचा अधिकाऱयांना इशारा : कार्यशाळेला गैरहजर असलेल्या कर्मचाऱयांवर होणार कारवाई
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका दोन टप्प्यात होत आहेत. त्या निवडणुकीसाठी अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. निवडणूक काळात अधिकाऱयांनी किंवा कर्मचाऱयांनी बेजबाबदारपणा केल्यास त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी दिला आहे. याचबरोबर निवडणूक कार्यक्रमांबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यशाळेला गैरहजर राहणाऱयांवरही कारवाई करणार असल्याचे जिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.
जिल्हय़ातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील ग्राम पंचायतींच्या निवडणुका मंगळवार दि. 22 रोजी होत आहेत. तर दुसऱया टप्प्यातील ग्राम पंचायतीच्या निवडणुका रविवार दि. 27 रोजी होत आहेत. या निवडणुकीसाठी सर्व ती तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक गावातील सरकारी शाळा तसेच खासगी शाळांमध्ये मतदान घेतले जाणार आहे. याचबरोबर इतर सरकारी इमारतींमध्येही मतदान घेण्यासाठी तेथेही निवडणूक केंद्र स्थापन करण्यात आले असून मतदारांनी आपल्या मतदान केंद्रामध्ये मतदानाचा हक्क बजावयाचा आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये 259 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. तर दुसऱया टप्प्यामध्ये 218 ग्राम पंचायतीच्या निवडणुका होत आहेत. पहिल्या टप्प्यातील निवडणुकीचे अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याचबरोबर आता प्रचारही अंतिम टप्प्यात आला असून 22 रोजी मतदान होणार आहे. तर दुसऱया टप्प्यातील निवडणुकीसाठी अर्ज दाखल प्रक्रिया पूर्ण झाली असून शनिवार दि. 19 रोजी माघार घेण्याचा शेवटचा दिवस आहे. त्यामुळे त्यानंतरच या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
या निवडणुकीसाठी मतदान केंद्राबरोबरच त्या ठिकाणी निवडणूक अधिकारी व कर्मचाऱयांची नेमणूक करण्यात आली आहे. सर्वांनी एकजुटीने आणि कायद्याच्या चौकटीतच या निवडणुकीचे काम करायचे आहे. कोणीही बेजबाबदारपणा दाखविला तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.