ऑनलाईन टीम / आग्रा :
उत्तरप्रदेशातील आग्रामध्ये मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. यमुना एक्सप्रेसवेवर एका कारला भीषण अपघात झाला असून त्यातील 5 जण जिवंत जळाले.
मिळालेल्या माहितीनुसार, आग्राच्या खंदौली विभागात कार पोहोचल्यानंतर हा अपघात झाला. कार वेगात असल्याने थेट जाऊन कंटेनरवर आदळली. ही टक्कर एवढी जोरदार होती की यामुळे मोठा आवाज येऊन कारला आग लागली.
कारचा दरवाजा उघडून बाहेर पडण्याआधीच आतील प्रवासी आगीने विक्राळ रुप धारण केले. आतल्या पाच जणांचा जळून मृत्यू झाला. भीषण आगीमुळे बाजुने जाणाऱ्यांचेही जवळ जाण्याचे धाडस झाले नाही.
दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी पोहचून सर्व मृतदेह पोस्टमार्टेमसाठी पाठवले आहेत. मृतांची ओळख अजूनही पोहचली नसून, पोलीस अधिक तपास करीत आहेत. अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दु:ख व्यक्त केले आहे.