बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. दुपारी दोन पर्यंत भाजप समर्थित ग्रामपंचायत उमेदवार 5,255 जागांवर आघाडीवर आहेत तर काँग्रेस 3,090 जागांवर तर जेडी (एस) 1,565 जागांवर आघाडीवर आहे. पहिल्या टप्प्यात जवळपास ८२ टक्के मतदान झाले होते, तर दुसऱ्या टप्प्यात ८० टक्के मतदान झाले होते.
दरम्यान हे मतदान पक्ष चिन्हावर होत नसले तरी पक्षाच्या पाठिंब्यावर निवडणूक लढवीत असणारे उमेदवार विजयी व्हावे यासाठी तमाम राजकीय पक्षांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे तळागाळातील राजकारणावर त्यांचा ताबा कायम राहू शकेल जे त्यांना तालुक्यात फायद्याचे ठरू शकेल किंवा जिल्हा पंचायत आणि विधानसभा निवडणुका जेव्हा जेव्हा होतात तेव्हा फायदा होईल.
कर्नाटकातील ५७२८ ग्रामपंचायतींची मतमोजणी बुधवारी सकाळी आठ वाजता सुरू झाली.