गुवाहाटी / वृत्तसंस्था
आसाम सरकारने चहाच्या मळय़ांमध्ये काम करणाऱया कामगारांच्या प्रतिदिन वेतनात 167 वरून 217 पर्यंत वाढ केली आहे. या कामगारांनी वेतनवाढीची मागणी अनेक वर्षांपासून चालविली होती. याशिवाय लहान मळय़ांमध्ये काम करणाऱया कामगारांनाही समान वेतन मिळावे या मागणीचा विचार करण्यासाठी राज्याचे प्रमुख सचिव डॉ. जे. बी. एक्का यांच्या अध्यक्षतेत एक सदस्यीय आयोगाची स्थापनाही करण्यात आली आहे. आसामच्या 126 विधानसभा मतदारसंघांमधील 40 मतदारसंघांमध्ये चहामुळे कामगारांची मते निर्णायक ठरत असतात. याचा विचार करूनच वेतनवाढ दिली असल्याची शक्यता आहे.