वार्ताहर / रामनगर
खानापूर-रामनगर महामार्गावर पडलेले खड्डे बुजवावे व अवजड वाहनांना बंदी घालण्यासाठी सोमवार दि. 22 रोजी रास्ता रोको करण्यात आला होता. त्यामुळे सध्या खानापूर तहसीलदारांच्या आदेशावरून या मार्गावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात येणार असून लोंढा क्रॉस येथे बरिकेड्स घालण्यात आले आहेत.
मात्र, येथील कर्मचाऱयांना अवजड वाहनांचे चालक अरे-तुरे करून मार्गावरून जात असल्याने लोंढा गावातील नागरिकांनी महार्गावर अवजड वाहने पुन्हा शुक्रवारपासून परत पाठविण्यास सुरुवात केली. तसेच येत्या 8 दिवसांत खड्डे न बुजविल्यास सूचना न देता अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात यईल. यावेळी अनुचित प्रकार घडल्यास बेळगावचे जिल्हाधिकारी व खानापूर तहसीलदार जबाबदार राहतील, असा इशारा देण्यात आला. यावेळे बाबुराव देसाई, अनिल मिठारी, संतोष चितळे, रमेश कांबळे, परशराम बडीयार, जयवंत नाईक, सुनिल जयमठ्ठी, रामा होसमणी आदी उपस्थित होते.