काश्मीरमधील दर्दपोरा गावाचा अनोखा प्रवास
हिंसाचारात 700 पैकी 327 महिलांनी जोडीदार गमावला
काश्मीरमध्ये श्रीनगरपासून 120 किलोमीटर अंतरावर घनदाट जंगल आणि शिखरांनजीक 700 कुटुंबांचे गाव आहे दर्दपोरा. 1990 ते 2003 दरम्यान काश्मीरमध्ये दहशतवादाने टोक गाठले होते, तेव्हा प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या या गावाने स्वतःच्या नावानुसार ‘दर्द’ (वेदना)च झेलल्या. पण 2003 नंतर मागील 17 वर्षांमध्ये येथे शांतता नांदू लागली आहेत. आता गावातून दहशतवादी नव्हे तर डॉक्टर, इंजिनियर आणि शिक्षक बाहेर पडत आहेत.
गावातील निम्म्या म्हणजेच 327 कुटुंबांतील महिलांनी दहशतवादामुळे स्वतःचा पती गमावला आहे. पण एका दशकात गावातील कुठल्याच मुलाने दहशतवादाचा मार्ग चोखाळलेला नाही. आज गावाच्या परिसरात 5-6 शाळा असून साक्षरतेचे प्रमाण 70 टक्क्यांपेक्षा अधिक आहे.
गावातील प्रत्येक मूल शिकतेय
येथील तरुण काश्मीरबाहेर देखील व्यवसाय करत आहेत. तीन तरुण डॉक्टर झाले ओत. काही इंजिनियर तर व्याख्याते म्हणून कार्यरत आहेत. गावातील प्रत्येक मूल शिकत आहे. आम्ही हिंसाचाराचे शिकार राहिलो असलो तरी लोक नवी सुरुवात करू इच्छितात. मुलंमुली उच्च शिक्षणासाठी विदेशात गेल्याचे उद्गार शिक्षक शब्बीर अहमद यांनी काढले आहेत.
आजी-आजोबांनी वाढविले
30 वर्षीय सुहैल अहमद यांच्या वडिलांची दोन दशकांपूर्वी बंदुकधाऱयांनी हत्या केली होती. त्यांचे संगोपन आई आणि आजोबांनी केले आहे. अहमद हे महाविद्यालयात व्याख्याते ओत. या गावाने हिंसाचाराचा क्रूर चेहरा पाहिला आहे. आम्ही अनेक अडचणी पाहिल्या आहेत, असे सुहैल सांगतात.
पतीची हत्या, मुलगा बेपत्ता
शांतता आणि प्रगतीच्या वाटेवर परतणे गावासाठी सोपे नव्हते. 65 वर्षीय शाहमल्ला बानो दररोज वीट आणि मातीने तयार केलेल्या स्वतःच्या घराबाहेर बसून आपल्या मुलाची प्रतीक्षा करतात. सप्टेंबर 2002 मध्ये त्यांचे पती अब्दुल्ला बट कामावरून परतत असताना घरापासून 50 मीटर अंतरावर अज्ञात बंदुकधाऱयांनी त्यांच्यावर गोळय़ा झाडल्या होत्या. पतीच्या मृत्यूच्या वर्षभराने 17 वर्षीय मुलगा मुश्ताकही घरी परतला नसल्याचे बानो सांगतात. दहशतवादाच्या संकटादरम्यान सैन्याचा खबऱया असल्याच्या संशयावरूनही लोकांना ठार करण्यात आले होते. येथली सुमारे 600 मुले काश्मीरच्या विविध अनाथालयांमध्ये राहत आहेत.